शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तिहेरी तलाक विधेयकास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:15 IST

तिहेरी तलाकवर बंदी घालणा-या विधेयकास विरोध दर्शवीत आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अंतर्गत ईस्लाहे ए- मुशरा जालना जिल्हा कमिटीच्या महिला शाखेतर्फे शनिवारी शहरात मोर्चा काढण्यात आला.

जालना : तिहेरी तलाकवर बंदी घालणा-या विधेयकास विरोध दर्शवीत आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अंतर्गत ईस्लाहे ए- मुशरा जालना जिल्हा कमिटीच्या महिला शाखेतर्फे शनिवारी शहरात मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद शाळेपासून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे जुना जालना ईदगाह मैदानावर सभेत रुपांतर झाले. या वेळी कमिटीच्या महिला पदाधिका-यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.केंद्र शासनाने तिहेरी तलाकवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून विरोध होत असून, ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सकाळी जिल्हा परिषद शाळेपासून या मोर्चास सुरुवात झाली. बुरखा परिधान करून मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग झालेल्या महिलांनी हातात फलक घेऊन आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. गांधी चमन, शनि मंदिर, कचेरी रोड मार्गे जुना जालन्यातील ईदगाह मैदानावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.यावेळी आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या औरंगाबाद येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या फइमुन्निसा बेगम यांनी आपल्या भाषणातून तीन तलाक संदर्भात केंद्र शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. त्या म्हणाल्या, की मुस्लिमांचा शरियत कायदा हा नीतीमूल्य हक्क अधिकाराला जपणारा आहे. खुदा आणि रसूल यांचा पवित्र कायदा आम्ही तोडू देणार नाही. इस्लाम धर्मात व्यक्ती शरियत कायद्यावर अंमलबजावणी करून लग्न आणि संसार करते तीच व्यक्ती ख-या अर्थाने बहादूर आहे. मुस्लिम समाजाने महिलांना त्यांचे वारसाहक्क हे शरियत कायद्यानुसार दिले गेले पाहिजेत. परंतु या गोष्टी सहजपणे होत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. मुस्लिम समाजात विवाह साध्या पद्धतीने करायला हवेत. मात्र, आज अन्य समाजांचे अनुकरण करीत मुस्लिम समाजही विवाहात बडेजावासाठी मोठा खर्च करीत आहे. हे इस्लामला मान्य नाही. जमियुतल मोहसीनात यास्मीन साहेबा व औरंगाबाद येथील शबाना आमी म्हणाल्या की, केंद्र शासनाने मूठभर महिलांचे म्हणणे ऐकून कोट्यवधी महिलांचा विश्वासघात करीत तिहेरी तलाक बंदी कायदा करण्याची घाई केली. शासनाने ताबडतोब त्यांचे पाऊल मागे घ्यावे, नसता देशभरामध्ये यापेक्षाही जास्त मोठे आंदोलन उभारण्यात येईल.जाहीर सभेच्या ठिकाणी मेहजबीन आणि अमीना आलमाश यांनी इंग्रजी आणि ऊर्दू भाषेत मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. तहसीलदार विपीन पाटील यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर यासमीन साहेबा, जमितुल मोसीनात, फहिमूलनिसा (जमाते ईस्लामी हिंद) , नगरसेविका खान रफिया वाजेद खान, खान रुबिना अमजद खान, फरीन अजहर, फरहाना अन्सारी, शबनम कमल खान, मेराज बाजी, समीना यास्मीन अब्दुल हाफीज, अतिया सलीम, अमीना मुजीब आदींच्या स्वाक्ष-या आहेत. यावेळी तहसीलदार विपीन पाटील यांनी निवेदन स्वीकारून मोर्चेक-यांच्या भावना शासनाला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले. अमिना अलमाश यांनी सूत्रसंचालन केले तर अ. रऊफ नदवी यांनी आभार मानले.---------------जिल्हा परिषद शाळेपासून सुुरुवात झालेल्या महिला मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी मुस्लिम महिला बुरखा परिधान करून होत्या. हातामध्ये विविध मागण्यांचे फलक झळकत होते. शिस्तबद्धता आणि शांततेत हा मोर्चा काढण्यात आला. कोणतीही घोषणाबाजी करण्यात आली नाही.---------------ना बदला है, ना बदलेगा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड खुदा और रसूल का कानून नही तोडा दिया जाऐगा, हम वक्त पडनेपर जान भी दे देंगे, अशा तीव्र भावना सहभागी महिलांनी सभेत व्यक्त केल्या. मोर्चासोबत बंदोबस्तासाठी महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होत्या.