शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

उत्पादनाच्या विकेंद्रीकरणातच स्वयंरोजगाराच्या संधी तयार होतात- देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:33 IST

उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित १५ व्या राज्यस्तरीय गांधीविचार अभ्यास शिबिरात स्वावलंबन आणि स्वयंरोजगार या विषयावर ‘त्या’ बोलत होत्या.पुढे बोलताना ‘त्या’ म्हणाल्या की, स्वयंरोजगारातून बनवलेल्या वस्तू सर्वांनी वापराव्या, जेणेकरून अनेकांना रोजगार मिळेल आणि संपत्तीचे केंद्रीकरण होणार नाही, विषमताही निर्माण होणार नाही. आज पन्नास टक्केपेक्षा अधिक संपत्ती काही निवडक लोकांच्या हातात आहे आणि त्याची वृद्धी काही पटीत होताना दिसते. यामुळे गरिबी, बेरोजगारीसारख्या समस्या वाढत आहे. आजची शिक्षण व्यवस्था तरुणांना निरुद्योगी व परावलंबी करणारी आहे, ज्यामुळे बेकारीचा प्रश्न समाजात निर्माण झाला आहे. त्यासाठी तरुणांनी स्वावलंबनातून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या नव्या समाजव्यवस्थेसाठी प्रयत्न करावेत. तरुणांनी समाज माध्यमांद्वारे विकास, प्रगती यांचे वरवरचे अर्थ समजून घेण्यापेक्षा वर्तमानपत्र व संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून ते नीट समजून घेतले पाहिजे.आपला विकास साध्य करताना आपल्या हातातून जाणाºया पैशाचा प्रवास विचारात घ्यावा. ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.भौतिक सुखामुळे माणूस आत्ममग्न होतो व नव्या स्मार्ट जगण्याच्या कल्पनांना बळी पडतो. त्यासाठी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा महात्मा गांधींचा मंत्र आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSocialसामाजिक