शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

उत्पादनाच्या विकेंद्रीकरणातच स्वयंरोजगाराच्या संधी तयार होतात- देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:33 IST

उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित १५ व्या राज्यस्तरीय गांधीविचार अभ्यास शिबिरात स्वावलंबन आणि स्वयंरोजगार या विषयावर ‘त्या’ बोलत होत्या.पुढे बोलताना ‘त्या’ म्हणाल्या की, स्वयंरोजगारातून बनवलेल्या वस्तू सर्वांनी वापराव्या, जेणेकरून अनेकांना रोजगार मिळेल आणि संपत्तीचे केंद्रीकरण होणार नाही, विषमताही निर्माण होणार नाही. आज पन्नास टक्केपेक्षा अधिक संपत्ती काही निवडक लोकांच्या हातात आहे आणि त्याची वृद्धी काही पटीत होताना दिसते. यामुळे गरिबी, बेरोजगारीसारख्या समस्या वाढत आहे. आजची शिक्षण व्यवस्था तरुणांना निरुद्योगी व परावलंबी करणारी आहे, ज्यामुळे बेकारीचा प्रश्न समाजात निर्माण झाला आहे. त्यासाठी तरुणांनी स्वावलंबनातून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या नव्या समाजव्यवस्थेसाठी प्रयत्न करावेत. तरुणांनी समाज माध्यमांद्वारे विकास, प्रगती यांचे वरवरचे अर्थ समजून घेण्यापेक्षा वर्तमानपत्र व संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून ते नीट समजून घेतले पाहिजे.आपला विकास साध्य करताना आपल्या हातातून जाणाºया पैशाचा प्रवास विचारात घ्यावा. ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.भौतिक सुखामुळे माणूस आत्ममग्न होतो व नव्या स्मार्ट जगण्याच्या कल्पनांना बळी पडतो. त्यासाठी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा महात्मा गांधींचा मंत्र आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSocialसामाजिक