शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

उत्पादनाच्या विकेंद्रीकरणातच स्वयंरोजगाराच्या संधी तयार होतात- देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:33 IST

उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित १५ व्या राज्यस्तरीय गांधीविचार अभ्यास शिबिरात स्वावलंबन आणि स्वयंरोजगार या विषयावर ‘त्या’ बोलत होत्या.पुढे बोलताना ‘त्या’ म्हणाल्या की, स्वयंरोजगारातून बनवलेल्या वस्तू सर्वांनी वापराव्या, जेणेकरून अनेकांना रोजगार मिळेल आणि संपत्तीचे केंद्रीकरण होणार नाही, विषमताही निर्माण होणार नाही. आज पन्नास टक्केपेक्षा अधिक संपत्ती काही निवडक लोकांच्या हातात आहे आणि त्याची वृद्धी काही पटीत होताना दिसते. यामुळे गरिबी, बेरोजगारीसारख्या समस्या वाढत आहे. आजची शिक्षण व्यवस्था तरुणांना निरुद्योगी व परावलंबी करणारी आहे, ज्यामुळे बेकारीचा प्रश्न समाजात निर्माण झाला आहे. त्यासाठी तरुणांनी स्वावलंबनातून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या नव्या समाजव्यवस्थेसाठी प्रयत्न करावेत. तरुणांनी समाज माध्यमांद्वारे विकास, प्रगती यांचे वरवरचे अर्थ समजून घेण्यापेक्षा वर्तमानपत्र व संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून ते नीट समजून घेतले पाहिजे.आपला विकास साध्य करताना आपल्या हातातून जाणाºया पैशाचा प्रवास विचारात घ्यावा. ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.भौतिक सुखामुळे माणूस आत्ममग्न होतो व नव्या स्मार्ट जगण्याच्या कल्पनांना बळी पडतो. त्यासाठी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा महात्मा गांधींचा मंत्र आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSocialसामाजिक