शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाणिज्य विभागातील संधीमुळे ओढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:00 IST

शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील प्रवेशाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वात जास्त वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच बँकींग आणि वित्तीय क्षेत्रातील संधी या युवकांना आकर्षित करत असल्याचे यावरून दिसून येते.

चैताली पालकर ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील प्रवेशाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वात जास्त वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच बँकींग आणि वित्तीय क्षेत्रातील संधी या युवकांना आकर्षित करत असल्याचे यावरून दिसून येते.येथील जेईएस महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्याकडे वाणिज्य विभागाच्या तीन तुकड्या आहेत. त्यात आतापर्यंत जवळपास ४८५ जणांनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्या तुलनेने विज्ञान आणि आर्टस शाखेत पूर्वी एवढे विद्यार्थी येत नसल्याचे त्यांनी सांगितले. वाणिज्य विषयात पदवी अथवा बारावी उत्तीर्ण झाल्यावर सीए. कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाऊंटंट, तसेच कसल्लागर यासह बँकांमध्ये मोठी संधी असल्याचे सांगण्यात आले. येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.आर. गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देखील यंदा वाणिज्य विषयाची नोंदणी सर्वात जास्त झाल्याचे सांगितले.राष्ट्रमाता महाविद्यालयात मात्र, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स आणि क्रॉप सायन्स या दोन विषयांना प्रॅक्टीकलचे गुण मिळत असल्याने येथे अ‍ॅडमिशनसाठी रांगा लागल्याचे चित्र होते.दहावीची मूळ गुणपत्रिका आणि टीसी मिळाल्यानंतर आता आयटीआयमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. नोंदणी केल्यावर लगेचच अर्जांची छाननी प्रक्रिया येथे सुरू असल्याची माहिती प्राचार्य देविदास राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षण