शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

उघड्यावरील खाद्यपदार्थ; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:39 IST

शहरात ठिकठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थ ठेवून त्याची विक्री सुरू असून, यामुळे जालनेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात ठिकठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थ ठेवून त्याची विक्री सुरू असून, यामुळे जालनेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, व्यावसायिकांना कारवाईची कसलीही भीती उरलेली नसतानाच हे अन्नपदार्थ खाणाऱ्यांनाही आपल्या आरोग्याची काळजी नसल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जालना शहरात विविध ठिकाणाहून नागरिकांचा सातत्याने राबता असतो. त्यामुळे मुख्य मार्गावरील तसेच बसस्थानक, शासकीय कार्यालय परिसरातील हॉटेल्समध्ये खाण्या-पिण्यासाठी सातत्याने वर्दळ दिसून येते.मात्र, ग्राहकांना खाण्यासाठी देण्यात येणारे हे अन्नपदार्थ सुरक्षितरीत्या झाकून ठेवण्याकडे व्यासायिकांचा कानाडोळा होत असल्याचे चित्र आहे. शिवाय, अनेक ठिकाणी हातगाड्यांवर अन्नपदार्थांची विक्री होत असून, याच्या आजूबाजूलाही कमालीची दुर्गंधी व घाण साचल्याचे चित्र आहे. त्यातच सध्या शहराच्या अनेक भागांत प्रशासनाच्या वतीने रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ होत आहे. उघड्या अन्नपदार्थांवर ही धूळ जात असल्यामुळे हे पदार्थ खाण्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.अन्न व औषध प्रशासनाकडून अधून-मधून अशा व्यावसायिकांवर कारवाईचा फार्स केला जात असला तरी याची फारशी भीती व्यावसायिकांमध्ये असल्याचे दिसून येत नाही.कारवाई झाली तरी नियमानुसार दंड भरून हे व्यावसायिक पुन्हा आपला व्यवसाय त्याच पध्दतीने सुरू ठेवतात. त्यामुळे या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे.सूचना : ग्राहकांनी काळजी घ्यावीअन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वर्षभरामध्ये हॉटेलमधील अन्नपदार्थ नमुन्यांची तपासणी करण्यात येऊन संबंधितांना सुधारणा नोटिसाही बजावण्यात आल्या. यापुढेही कारवाई चालूच राहील. परंतु, ग्राहकांनी देखील आपण खात असलेले अन्नपदार्थ झाकून ठेवलेले किंवा स्वच्छ आहेत की नाहीत, हे पाहणे गरजेचे असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. ई. देसाई यांनी सांगितले.८७ नमुन्यांची तपासणीअन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वर्षभरात जिल्ह्यातून वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे ८७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील ७४ नमुने प्रमाणित तर १ नमुना अप्रमाणित आढळून आला. तर तीन प्रकरणांमधील अहवाल अद्याप बाकी आहे. अप्रमाणित नमुन्यांबाबतचा अहवाल सहायक आयुक्तांकडे दाखल करण्यात आला असून, यात या व्यावसायिकांवर ठेवलेले आरोप सिध्द झाल्यास किरकोळ त्रुटींसाठी दहा लाखांपर्यंतचा दंड व गंभीर बाबीसाठी ६ महिने ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.३९ हॉटेल चालकांना नोटिसादरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ८० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ३९ हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्याचे सहायक आयुक्त देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागMarketबाजारHealthआरोग्य