शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जीवरेखा प्रकल्पात केवळ १७ टक्के उपयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST

टेंभुर्णी परिसरातील छोटे-मोठे तलाव अजूनही कोरडेच टेंभुर्णी : जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली आहे. परंतु, टेंभुर्णीसह अकोलादेव व परिसरात ...

टेंभुर्णी परिसरातील छोटे-मोठे तलाव अजूनही कोरडेच

टेंभुर्णी : जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली आहे. परंतु, टेंभुर्णीसह अकोलादेव व परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मोठा पाऊस नसल्याने अकोलादेव येथील जीवरेखा प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ १७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर भविष्यात या भागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

टेंभुर्णी परिसरात पिकांसाठी मुबलक पाऊस पडला असल्याने सध्या पीकस्थिती समाधानकारक आहे. मात्र, परिसरात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील छोटे-मोठे तलाव अजूनही कोरडेच आहेत. जाफराबाद तालुक्यातील सर्वांत मोठा मध्यम प्रकल्प असलेल्या अकोलादेव येथील जीवरेखा धरणात या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ एक फूट पाणी वाढले आहे. यामुळे टेंभुर्णीसह परिसरातील आठ गावांना पाणीपुरवठा करणारे हे धरण यावर्षी तुडुंब भरणार का, याची चिंता नागरिकांना सतावत आहे. ६.८९ दलक्षघमी क्षमता असलेले हे धरण गतवर्षी जुलै महिन्यातच तुडुंब भरले होते. मात्र, यावर्षी सप्टेंबर महिना अर्धा उलटला तरी धरणात सध्या १७ टक्केच पाणीसाठा असल्याचे टेंभुर्णी पाटबंधारे विभागाच्या अभियंता माधुरी जुन्नारे यांनी सांगितले. यावर्षी जर धरण भरले नाही तर येणाऱ्या उन्हाळ्यात टेंभुर्णीसह परिसरातील आठ-दहा गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्ररूप धारण करू शकतो.

चौकट

रब्बी पिकांनाही होतो लाभ

जीवरेखा धरणातून १७.६ किलोमीटर लांबीचा कालवा काढण्यात आला आहे. जर हे धरण तुडुंब भरले, तर दरवर्षी रब्बी हंगामासाठी या धरणातून कालव्याद्वारे तीन वेळा पाणी सोडले जाते. या पाण्याचा लाभ अकोलादेव, टेंभुर्णी, गणेशपूर, पापळ, गोंधनखेडा, सावंगी, आदी शिवारातील जवळपास १२९९ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना होतो. यावर्षी जर धरण पूर्ण भरले तर निश्चितच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठा लाभ होणार आहे.