शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो

By विजय मुंडे  | Updated: July 15, 2023 17:46 IST

हाती आलेले पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ, लाखोंचा खर्च वाया

- फकिरा देशमुखभोकरदन : बाजारामध्ये टोमॅटोला विक्रमी १२० ते १५० रूपये किलोचा दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. परंतु, दुसरीकडे लाखो रूपयांचा केलेला खर्च करपा रोगामुळे मातीत गेल्याचे चित्र भोकरदन तालुक्यातील विविध भागात आहे. रोग पडल्याने टोमॅटो पिकावर दोन लाख रूपयांचा खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना हाती आलेले पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ आली आहे.

कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटांच्या फेऱ्यात शेतकरी अडकत आहेत. त्यातच मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने, यंदाचा खरीप हंगामही लांबला आहे. भाजीपाला पिकांतून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांवर पडणाऱ्या रोगराईमुळे फटका बसला आहे. करपा रोगामुळे केवळ पाच दिवसातच पीक बसून जात असल्याने शेतकऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी वेळही मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

भोकरदन येथील शेतकरी आप्पाराव देशमुख यांनी सांगितले की, शेडनेटमध्ये अर्धा एकर टोमॅटो लागवड केला, त्यासाठी 50 हजार खर्च केला. केवळ पाच कॅरेट निघाले., करपा रोग पडल्याने अख्खे पीक उपटून टाकावे लागले. तर ४० हजार खर्च करून अर्ध्या एकरात टोमॅटो लागवड केलेल्या इब्राहिमपूर येथील गोविंदसिंग भेडरवाल यांचाही अनुभव यापेक्षा वेगळा नाही. करपा रोगामुळे माल लागला नाही, केलेला खर्च निघेल की नाही, अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. मुठाड येथील राजेंद्र राठी यांनी अडीच एकरावर टोमॅटो लागवड केली. त्यासाठी दोन लाख खर्च केला, मात्र अचानक पूर्ण पिकावर करपा आला व हे पीक होत्याचे नव्हते झाले, त्यामुळे ते उपटून टाकावे लागले, असे राठी यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना