शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसाठी जुनी पेन्शन म्हटल्यास तिजोरीवर ताण; आमदारांना पेन्शन देताना कुठे जातो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 17:32 IST

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटना आक्रमक; शासनाचे धोरण अन्यायकारक असल्याचा सूर

जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही, असे सांगितले आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील शिक्षक संघटनांमध्ये नाराजी पसरली असून, शासनाचे हे धोरण अन्यायकारक असल्याचा सूर निघत आहे. आमदारांना पेन्शन देताना तिजोरीवर ताण येत नाही का? असा संतप्त सवालही केला जात आहे.

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी विविध शिक्षक संघटनांनी वेळोवेळी शासन, प्रशासनाला निवेदने देण्यासह आंदोलनेही केली आहेत. अनेकवेळा मंत्री, अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही झाल्या आहेत. बैठकांमध्ये सकारात्मक भूमिका घेवू असे आश्वासन वेळोवेळी देण्यात आले होते. परंतु, हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करता येत नाही, असे शासनाकडून सांगण्यात आल्याने शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी सरकारी तिजोरीवर ताण येत असेल तर आमदारांना पेन्शन देण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर ताण येत नाही काय? असा भेदभाव फक्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कशासाठी? जुनी पेन्शन आमच्या हक्काची आहे आणि त्यासाठी आम्ही लढा  तीव्र करणार आहोत. शिवाय पेन्शन मिळवणारच असा आमचा निर्धार आहे.- ईश्वर गाडेकर, जिल्हाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना

जुन्या पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काढलेले उद्गार अत्यंत दुर्दैवी आहेत. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नसेल तर कर्मचारी संघटना अधिक आक्रमक होतील. शासनाने जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिक सकारात्मक निर्णय घ्यावा.- संतोष राजगुरू, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना

जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळाचा आधार असून, शासनाने २००५ नंतर सेवेत दाखल कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर कर्मचाऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल.- मंगेश जैवाळ, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रा.

शासकीय सेवेतील निवृत्तीनंतर व्यवस्थित पेन्शन मिळाली नाही तर त्यांचे भवितव्य अंधारात जाईल. लोकप्रतिनिधी ५ वर्षासाठी जितक्या वेळ निवडून येतात त्यांना त्याप्रमाणे निवृत्तिवेतन भेटते. जर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस योजना लाभदायक असेल व जुनी पेन्शन लागू केल्यास शासन आर्थिक दिवाळखोरीत जाणार असेल तर सर्व लोकप्रतिनिधींना ही जुन्या पेन्शन योजनेऐवजी एनपीएस योजना लागू करावी.- जावेद खान, जिल्हाध्यक्ष अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना

 जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी कवचकुंडल आहे. शासन सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना  पेन्शन लागू करणे ही घटनात्मक बाब आहे. २००५ नंतरच्या  कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन योजना शासनाकडून नाकारली जाणे ही बाब या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक अशीच आहे.                  - अरुण जाधव, राज्याध्यक्ष शिक्षक संघटना समन्वय समिती.

टॅग्स :Teacherशिक्षकState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalanaजालना