शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

साडेदहानंतरही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:25 IST

लोकमतच्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उशिरा येण्याचे प्रकार उघडकीस आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ मिनिटे ही निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयाच्या १८ दिवसांनंतर म्हणजे बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयात लोकमतच्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उशिरा येण्याचे प्रकार उघडकीस आले. साडेदहानंतरही जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.राज्य शासनाने सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळी सकाळी ९.४५ ठेवण्यात आली आहे. तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ ही निश्चित करण्यात आली आहे. निर्णयाच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्हाभरातील कार्यालयांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले होते. यात अनेक कर्मचारी व अधिकारी उशिरा कार्यालयात आल्याचे उघड झाले. या निर्णयाला जवळपास १८ दिवसांचा कालावधी झाला आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी अधिकारी व कर्मचारी करत नसल्याचे ‘लोकमत’ने जिल्हा परिषदेत बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.बुधवारी सकाळी १० वाजता झेडपीतील सर्व विभागांची पाहणी केली असता, जवळपास सर्वच विभागात शिपाई साफसफाई करताना दिसून आले.केवळ सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे व माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी गरूड हे दोन्ही अधिकारी कार्यालयात हजर होते.मुख्य कार्यकारी अधिका-यांसह इतर सर्व विभागांचे विभागप्रमुख १० वाजता कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले.अधिकारीच गैरहजर असल्याने प्रत्येक विभागात एक किंवा दोन कर्मचारी दिसून आले. यावरून शासनाने घेतलेल्या निर्णयाला अधिकारी व कर्मचारी केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र जालना जिल्हा परिषदेतून समोर येत आहे.कर्मचा-यांचे सुट्यांकडे लक्ष२९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ मिनिटे ही निश्चित करण्यात आली आहे. पहिले चार ते पाच दिवस अधिकारी व कर्मचा-यांनी नियम पाळला.त्यानंतर कोणीच बहुतांश कर्मचारी मर्जी प्रमाणे कार्यालयात ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही सर्वच कर्मचारी शनिवार व रविवारच्या सुट्यांची वाट पाहत राहतात.दरम्यान, अद्यापही मुख्य कार्यकारी अधिका-यांनी उशीरा आलेल्या कर्मचारी व अधिका-यांवर कारवाई केली नाही.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी