शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साडेदहानंतरही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:25 IST

लोकमतच्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उशिरा येण्याचे प्रकार उघडकीस आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ मिनिटे ही निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयाच्या १८ दिवसांनंतर म्हणजे बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयात लोकमतच्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उशिरा येण्याचे प्रकार उघडकीस आले. साडेदहानंतरही जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.राज्य शासनाने सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळी सकाळी ९.४५ ठेवण्यात आली आहे. तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ ही निश्चित करण्यात आली आहे. निर्णयाच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्हाभरातील कार्यालयांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले होते. यात अनेक कर्मचारी व अधिकारी उशिरा कार्यालयात आल्याचे उघड झाले. या निर्णयाला जवळपास १८ दिवसांचा कालावधी झाला आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी अधिकारी व कर्मचारी करत नसल्याचे ‘लोकमत’ने जिल्हा परिषदेत बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.बुधवारी सकाळी १० वाजता झेडपीतील सर्व विभागांची पाहणी केली असता, जवळपास सर्वच विभागात शिपाई साफसफाई करताना दिसून आले.केवळ सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे व माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी गरूड हे दोन्ही अधिकारी कार्यालयात हजर होते.मुख्य कार्यकारी अधिका-यांसह इतर सर्व विभागांचे विभागप्रमुख १० वाजता कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले.अधिकारीच गैरहजर असल्याने प्रत्येक विभागात एक किंवा दोन कर्मचारी दिसून आले. यावरून शासनाने घेतलेल्या निर्णयाला अधिकारी व कर्मचारी केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र जालना जिल्हा परिषदेतून समोर येत आहे.कर्मचा-यांचे सुट्यांकडे लक्ष२९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ मिनिटे ही निश्चित करण्यात आली आहे. पहिले चार ते पाच दिवस अधिकारी व कर्मचा-यांनी नियम पाळला.त्यानंतर कोणीच बहुतांश कर्मचारी मर्जी प्रमाणे कार्यालयात ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही सर्वच कर्मचारी शनिवार व रविवारच्या सुट्यांची वाट पाहत राहतात.दरम्यान, अद्यापही मुख्य कार्यकारी अधिका-यांनी उशीरा आलेल्या कर्मचारी व अधिका-यांवर कारवाई केली नाही.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी