शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

साडेदहानंतरही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:25 IST

लोकमतच्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उशिरा येण्याचे प्रकार उघडकीस आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ मिनिटे ही निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयाच्या १८ दिवसांनंतर म्हणजे बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयात लोकमतच्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उशिरा येण्याचे प्रकार उघडकीस आले. साडेदहानंतरही जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.राज्य शासनाने सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळी सकाळी ९.४५ ठेवण्यात आली आहे. तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ ही निश्चित करण्यात आली आहे. निर्णयाच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्हाभरातील कार्यालयांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले होते. यात अनेक कर्मचारी व अधिकारी उशिरा कार्यालयात आल्याचे उघड झाले. या निर्णयाला जवळपास १८ दिवसांचा कालावधी झाला आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी अधिकारी व कर्मचारी करत नसल्याचे ‘लोकमत’ने जिल्हा परिषदेत बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.बुधवारी सकाळी १० वाजता झेडपीतील सर्व विभागांची पाहणी केली असता, जवळपास सर्वच विभागात शिपाई साफसफाई करताना दिसून आले.केवळ सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे व माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी गरूड हे दोन्ही अधिकारी कार्यालयात हजर होते.मुख्य कार्यकारी अधिका-यांसह इतर सर्व विभागांचे विभागप्रमुख १० वाजता कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले.अधिकारीच गैरहजर असल्याने प्रत्येक विभागात एक किंवा दोन कर्मचारी दिसून आले. यावरून शासनाने घेतलेल्या निर्णयाला अधिकारी व कर्मचारी केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र जालना जिल्हा परिषदेतून समोर येत आहे.कर्मचा-यांचे सुट्यांकडे लक्ष२९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ मिनिटे ही निश्चित करण्यात आली आहे. पहिले चार ते पाच दिवस अधिकारी व कर्मचा-यांनी नियम पाळला.त्यानंतर कोणीच बहुतांश कर्मचारी मर्जी प्रमाणे कार्यालयात ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही सर्वच कर्मचारी शनिवार व रविवारच्या सुट्यांची वाट पाहत राहतात.दरम्यान, अद्यापही मुख्य कार्यकारी अधिका-यांनी उशीरा आलेल्या कर्मचारी व अधिका-यांवर कारवाई केली नाही.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी