शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रिकाम्या खिशाने पोषण आहार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:10 IST

अत्यल्प मानधनावर शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करणाऱ्या कामगारांना मागील चार महिन्यांपासूनचे मानधन मिळालेले नाही.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अत्यल्प मानधनावर शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करणाऱ्या कामगारांना मागील चार महिन्यांपासूनचे मानधन मिळालेले नाही. हलाखीची परिस्थिती असणाºया या कामगारांना ऊसनवारी करून आर्थिक गरजा भागाव्या लागत आहेत.शासनाच्या माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १९०० प्राथमिक व माध्यमिक शाळांममधील एक लाखांवर विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार दिला जातो. बहुतांश शाळांमध्ये अनेक वर्षांपासून पोषण आहार कामगार हजार रुपये प्रती महिना एवढ्या अत्यल्प मानधनावर माध्यान्ह भोजन शिजविण्याचे काम करतात. तर काही ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून हे काम केले जाते. मात्र, असंघटित असणा-या या कामागारांना शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्याचे मानधन वेळेत मिळने अपेक्षित असताना याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. दिवाळीमध्ये पोषण आहार कामगारांना पहिल्या शैक्षणिक सत्रातील मानधन देण्यात आले. आता दुसरे शैक्षणिक सत्र संपत आले तरी जानेवारी महिन्यांपासूनचे मानधन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे पोषण आहार शिजविण्यासाठी लागणारा खर्च भागविताना या कामगारांना उधारी-उसनवारी करावी लागत आहे. कधी-कधी मुख्याध्यापक स्वत:च्या खिशातून हा खर्च भागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे पोषण आहार कामगारांवरच उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, या पोषण आहार कामगारांचे जानेवारीपासूनचे मानधन देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे शालेय पोषण आहार अधीक्षक डॉ. सुशील सेवलीकर यांनी सांगितले.जिल्ह्यात पोषण आहार शिजविण्याचे काम नियमानुसार होते का, यात आणखी काय सुधारणा अपेक्षित आहे. याची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या पुणे विभागाचे उपसंचालक शरद गोसावी, अंकुश शहांगटवार, अजय बहिरे यांचे पथक शनिवारी जिल्ह्यातील काही शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहे. पोषण आहार कामगारांना केवळ सूचना देण्याऐवजी त्यांच्या समस्याही या पथकाने जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकfoodअन्न