शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

टँकर्सची संख्या ४५ वर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:58 IST

दोन आठवड्यांपूर्वी ३९ असलेली टँकरची संख्या आत्ता ४५ वर गेली आहे. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दिवसेदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जलसाठ्यांत घट झाल्याने पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी ३९ असलेली टँकरची संख्या आत्ता ४५ वर गेली आहे. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जाफराबाद, भोकरदन या तालुक्यांतही बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र, या दोन्ही तालुक्यांत कडक खडक असल्याने कितीही पाऊस पडला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. परिणामी लघु मध्यम प्रकल्प, बोअरवेल, विहिरी आदींना पाणीच राहत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. जलसाठा वाढत नसल्याने या तालुक्यांत टँकरची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जाफराबाद तालुक्यात १६ टँकर, भोकरदन तालुक्यात २७ टँकवरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जालना आणि परतूर तालुक्यात सुध्दा काही भाग खडकाळ असल्याने अल्प प्रमाणात टँकरची मागणी आहे.वाढते सिंचन आणि जायकवाडी धरणाचा परिसर असल्याने अंबड, घनसावंगी, मंठा आणि बदनापूर या तालुक्यांत वाढलेल्या सिंचनामुळे अद्याप टँकरची मागणी आलेली नाही. मात्र, आगामी काळात मागणी होण्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली आहे. टंचाईकृती आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. उपाययोजना आखण्यात आलेली आहे. मागणीनुसार टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.जिल्ह्यातील जलसाठे कमी होत असल्याने टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जलयुक्तच्या कामांमुळे तात्पुरत्या स्वरुपात साठा वाढला. पण तोही आटल्याने येत्या काळात टंचाई भीषण होण्याची शक्तय गृहित धरुन प्रशासनाने उपाययोजना आखली आहे. टॅकर्सची संख्या शतक गाठण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाई