शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

आता महिन्यातून चार वेळा पाणी सोडण्याचे पालिकेचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:52 IST

पंधरा दिवसानंतर एकदा सुटणारे पाणी आता आठ दिवसांवर आणण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराला पंधरा दिवसानंतर एकदा सुटणारे पाणी आता आठ दिवसांवर आणण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे. चंदनझिरा, ४८८ विश्रामगृह, आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बांधण्यात आलेल्या तीन टाक्यांमध्ये पाणी जायकवाडीतून आलेले पाणी साठविण्यात येणार आहे. यामुळे पाण्याची नासाडी कमी होऊन नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार आहे.सध्या ९० किमी.वरुन पैठण येथील जायकवाडी धरणातून शहरासाठी २० एमएलडी पाणी उचलले जाते. यातील ५ एलएमडी पाणी अंबड शहराला वितरित केले जाते. ३ एमएलडी पाणी गळती होते. यामुळे शहराला फक्त १२ एमएलडी पाणी मिळत आहे. आलेले १२ एमएलडी पाणी साठविण्याची क्षमता नगरपालिकाकडे नसल्याने आलेले पाणी जसेच्या तसे शहरात सोडल्याशिवाय पालिका प्रशासना कडे सध्या पर्याय नाही. यामुळे दोन दोन तास पाणी शहरात सोडण्यात येत आहे. यामुळे हजारो लिटर पिण्यायोग्य पाणी नाल्यामध्ये वाहून जात आहे. उन्हाची वाढती तीव्रता बघता नगरपालिका प्रशासनाने चंदनझिरा येथे १० लाख लिटर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात १० लाख लिटर तसेच शासकीय विश्रामगृह ४८८ येथे १० लाख लिटर अशा ३० लाख लिटर पाणी साठवेल या क्षमतेच्या टाक्या बांधल्या आहेत. येत्या आठ दिवसांत या तिन्ही टाक्यांमध्ये जायकवाडीतून आलेले पाणी साठविण्यात येणार आहे. यामुळे योग्य नियोजन करुन शहराला पाणी पुरवठा होणार आहे याचा नियोजन पालिका प्रशासनाने केले असून आता महिन्यातून किमान चार वेळा पाणी पुरवठा करण्यावर आमचा भर असणार आहे.व्हॉल्व्हची गळती थांबविलीजायकवाडीतून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे गळती लागली होती. यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. यामुळे शहरात दोन दिवसांपासून निर्जळी होती.यामुळे पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय झाली होती. नगरपालिका प्रशासनाने युध्दपातळीवर काम करून चिंचखेड, शेवगा पाटी, आणि पाचोड परिसरातील चार ठिकाणची लागलेली गळती थांबविली.

टॅग्स :WaterपाणीJalana Muncipalityजालना नगरपरिषद