शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

आता महिन्यातून चार वेळा पाणी सोडण्याचे पालिकेचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:52 IST

पंधरा दिवसानंतर एकदा सुटणारे पाणी आता आठ दिवसांवर आणण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराला पंधरा दिवसानंतर एकदा सुटणारे पाणी आता आठ दिवसांवर आणण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे. चंदनझिरा, ४८८ विश्रामगृह, आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बांधण्यात आलेल्या तीन टाक्यांमध्ये पाणी जायकवाडीतून आलेले पाणी साठविण्यात येणार आहे. यामुळे पाण्याची नासाडी कमी होऊन नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार आहे.सध्या ९० किमी.वरुन पैठण येथील जायकवाडी धरणातून शहरासाठी २० एमएलडी पाणी उचलले जाते. यातील ५ एलएमडी पाणी अंबड शहराला वितरित केले जाते. ३ एमएलडी पाणी गळती होते. यामुळे शहराला फक्त १२ एमएलडी पाणी मिळत आहे. आलेले १२ एमएलडी पाणी साठविण्याची क्षमता नगरपालिकाकडे नसल्याने आलेले पाणी जसेच्या तसे शहरात सोडल्याशिवाय पालिका प्रशासना कडे सध्या पर्याय नाही. यामुळे दोन दोन तास पाणी शहरात सोडण्यात येत आहे. यामुळे हजारो लिटर पिण्यायोग्य पाणी नाल्यामध्ये वाहून जात आहे. उन्हाची वाढती तीव्रता बघता नगरपालिका प्रशासनाने चंदनझिरा येथे १० लाख लिटर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात १० लाख लिटर तसेच शासकीय विश्रामगृह ४८८ येथे १० लाख लिटर अशा ३० लाख लिटर पाणी साठवेल या क्षमतेच्या टाक्या बांधल्या आहेत. येत्या आठ दिवसांत या तिन्ही टाक्यांमध्ये जायकवाडीतून आलेले पाणी साठविण्यात येणार आहे. यामुळे योग्य नियोजन करुन शहराला पाणी पुरवठा होणार आहे याचा नियोजन पालिका प्रशासनाने केले असून आता महिन्यातून किमान चार वेळा पाणी पुरवठा करण्यावर आमचा भर असणार आहे.व्हॉल्व्हची गळती थांबविलीजायकवाडीतून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे गळती लागली होती. यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. यामुळे शहरात दोन दिवसांपासून निर्जळी होती.यामुळे पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय झाली होती. नगरपालिका प्रशासनाने युध्दपातळीवर काम करून चिंचखेड, शेवगा पाटी, आणि पाचोड परिसरातील चार ठिकाणची लागलेली गळती थांबविली.

टॅग्स :WaterपाणीJalana Muncipalityजालना नगरपरिषद