शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

नाराज कोणीही नाही, ट्रिपल इंजिन सरकार जोरात काम करेल: रावसाहेब दानवे

By विजय मुंडे  | Updated: July 10, 2023 19:58 IST

अजित पवारांच्या कार्यशैलीचा शासनाला लाभ

जालना : आमच्यावर घर फोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी घर स्वत:कडे ठेवले आणि इतरांना बाहेर काढून दिले. त्यांच्या भाषेत आपण बोलणार नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांनी खुशाल महाराष्ट्रात फिरावे, सभा घ्याव्यात, आमच्यावर काही परिणाम होणार नाही, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. आमच्यात कोणीही नाराज नाही. ट्रिपल इंजन सरकार जोरात काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जालना येथे सोमवारी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपने घर फोडल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर बोलताना दानवे म्हणाले, त्यांनी घर नाही फोडलं, पण घरातून बाहेर काढून दिले. राज ठाकरे घराबाहेर गेले, घर स्वत: ठेवले त्याचे काय, असा सवाल करीत भाजप ज्यावेळी इतर पक्षातील लोकांना पक्षात घेते त्यावेळी त्यांना भाजपाच्या धोरणानुसार चालावे लागते. भाजपात आल्यानंतर त्यांना वेडीवाकडी कामे करू दिली नाहीत. २३ पक्षांचे सरकार अटल बिहारी वाजपेयी यांनी चालविले. इतक्या पक्षाचे सरकार आम्ही यशस्वीपणे चालविले. त्यामुळे त्यांचे बोलणे म्हणजे ते उदास झालेले आहेत. पुढच्या काळात सत्ता मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपवर टीका करणे हे विरोधकांचे काम झाले आहे. आमच्यात कोणी नाराज नाही. कोणी चिंता करू नये. ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे. जोरात लोड ओढेल. उद्धव ठाकरे यांनी खुशाल महाराष्ट्रात फिरावे, जागोजागी सभा घ्याव्यात, कोणताही परिणाम होणार नाही, असेही दानवे म्हणाले.

अजित पवारांच्या कार्यशैलीचा शासनाला लाभअजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे. विकास कामे करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचा शासनाला आणि जनतेला लाभ होईल, असे सांगताना शिंदे गटातील कोणीही नाराज नाही आणि भाजपतील कोणीही नाराज होणार नाही, असेही रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाAjit Pawarअजित पवार