शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

'आमची कोणाला ना नाही...'; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रस्तावावर जरांगे सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:46 IST

बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस: मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या: मनोज जरांगे

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : आम्ही खुनशी नाही, आमची कुणाला ना नाही, आम्ही जातीयवादी नाही, आम्ही काय दहशतवादी आहे का ? असा सवाल करत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या चर्चेच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आमचं लोकांबद्दल वाईट मत नाही. आमची कोणाला ना नाही. सगळं देश इथे येऊन गेला आहे, असे म्हणत पालकमंत्री मुंडे यांच्या भेटी संदर्भात निरोप पाठवेन आणि त्यांच्या निरोपची वाट पाहिलं या व्यक्तव्यावर जरांगे यांनी मत व्यक्त केले. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधवही उपोषणाला बसले आहेत.आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सकाळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना जरांगे म्हणाले, सरकारने संपर्क करण्याची आवश्यकता नाही. त्यांची गरज नाही. समाजाला शत्रू कोण हे कळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. माझ्या मनात काही नाही, मराठ्यांच्या ठरलेल्या मागण्या मान्य करा, असे उत्तर त्यांनी उदय सामंत यांना दिले. 

देशमुख कुटुंबांनी सहभागी होण्याची गरज नाही ते दुःखात आहे. मी बाकी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडा म्हणून सांगितलं आहे. माझ्या शरीराच वाटोळे झाले यांचे व्हायला नको. अशोक चव्हाण  भेटीला येणार आहे,  यावर बोलताना जरांगे म्हणाले, मध्यस्थी त्यांनी करावी, की दुसऱ्या कोणी आमची ना नाही. आमच्या लेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. आमच्या लोकांचं वाटोळे होत आहे हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बघितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या गुंडगिरी संपवायची की राहू द्यायची, अशी टिका संतोष देशमुख प्रकरणावर जरांगे यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्यासह १०२ जण उपोषणालामनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जरांगे यांच्यासोबत या सामूहिक आमरण उपोषणात अनेक मराठा आंदोलक देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांची डॉक्टरांकडून सकाळी तपासणी करण्यात आली. जरांगे यांची ब्लडशुगर खालावली आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी वैष्णवी नरवडे यांनी दिली आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे''त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तेथील वातावरण कसे असते, ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन'', असे जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेटीवर प्रतिक्रिया दिली होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना