शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'आमची कोणाला ना नाही...'; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रस्तावावर जरांगे सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:46 IST

बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस: मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या: मनोज जरांगे

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : आम्ही खुनशी नाही, आमची कुणाला ना नाही, आम्ही जातीयवादी नाही, आम्ही काय दहशतवादी आहे का ? असा सवाल करत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या चर्चेच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आमचं लोकांबद्दल वाईट मत नाही. आमची कोणाला ना नाही. सगळं देश इथे येऊन गेला आहे, असे म्हणत पालकमंत्री मुंडे यांच्या भेटी संदर्भात निरोप पाठवेन आणि त्यांच्या निरोपची वाट पाहिलं या व्यक्तव्यावर जरांगे यांनी मत व्यक्त केले. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधवही उपोषणाला बसले आहेत.आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सकाळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना जरांगे म्हणाले, सरकारने संपर्क करण्याची आवश्यकता नाही. त्यांची गरज नाही. समाजाला शत्रू कोण हे कळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. माझ्या मनात काही नाही, मराठ्यांच्या ठरलेल्या मागण्या मान्य करा, असे उत्तर त्यांनी उदय सामंत यांना दिले. 

देशमुख कुटुंबांनी सहभागी होण्याची गरज नाही ते दुःखात आहे. मी बाकी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडा म्हणून सांगितलं आहे. माझ्या शरीराच वाटोळे झाले यांचे व्हायला नको. अशोक चव्हाण  भेटीला येणार आहे,  यावर बोलताना जरांगे म्हणाले, मध्यस्थी त्यांनी करावी, की दुसऱ्या कोणी आमची ना नाही. आमच्या लेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. आमच्या लोकांचं वाटोळे होत आहे हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बघितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या गुंडगिरी संपवायची की राहू द्यायची, अशी टिका संतोष देशमुख प्रकरणावर जरांगे यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्यासह १०२ जण उपोषणालामनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जरांगे यांच्यासोबत या सामूहिक आमरण उपोषणात अनेक मराठा आंदोलक देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांची डॉक्टरांकडून सकाळी तपासणी करण्यात आली. जरांगे यांची ब्लडशुगर खालावली आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी वैष्णवी नरवडे यांनी दिली आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे''त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तेथील वातावरण कसे असते, ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन'', असे जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेटीवर प्रतिक्रिया दिली होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना