शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'आमची कोणाला ना नाही...'; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रस्तावावर जरांगे सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:46 IST

बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस: मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या: मनोज जरांगे

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : आम्ही खुनशी नाही, आमची कुणाला ना नाही, आम्ही जातीयवादी नाही, आम्ही काय दहशतवादी आहे का ? असा सवाल करत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या चर्चेच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आमचं लोकांबद्दल वाईट मत नाही. आमची कोणाला ना नाही. सगळं देश इथे येऊन गेला आहे, असे म्हणत पालकमंत्री मुंडे यांच्या भेटी संदर्भात निरोप पाठवेन आणि त्यांच्या निरोपची वाट पाहिलं या व्यक्तव्यावर जरांगे यांनी मत व्यक्त केले. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधवही उपोषणाला बसले आहेत.आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सकाळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना जरांगे म्हणाले, सरकारने संपर्क करण्याची आवश्यकता नाही. त्यांची गरज नाही. समाजाला शत्रू कोण हे कळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. माझ्या मनात काही नाही, मराठ्यांच्या ठरलेल्या मागण्या मान्य करा, असे उत्तर त्यांनी उदय सामंत यांना दिले. 

देशमुख कुटुंबांनी सहभागी होण्याची गरज नाही ते दुःखात आहे. मी बाकी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडा म्हणून सांगितलं आहे. माझ्या शरीराच वाटोळे झाले यांचे व्हायला नको. अशोक चव्हाण  भेटीला येणार आहे,  यावर बोलताना जरांगे म्हणाले, मध्यस्थी त्यांनी करावी, की दुसऱ्या कोणी आमची ना नाही. आमच्या लेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. आमच्या लोकांचं वाटोळे होत आहे हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बघितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या गुंडगिरी संपवायची की राहू द्यायची, अशी टिका संतोष देशमुख प्रकरणावर जरांगे यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्यासह १०२ जण उपोषणालामनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जरांगे यांच्यासोबत या सामूहिक आमरण उपोषणात अनेक मराठा आंदोलक देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांची डॉक्टरांकडून सकाळी तपासणी करण्यात आली. जरांगे यांची ब्लडशुगर खालावली आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी वैष्णवी नरवडे यांनी दिली आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे''त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तेथील वातावरण कसे असते, ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन'', असे जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेटीवर प्रतिक्रिया दिली होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना