शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

मन खंबीर असेल तर औषधाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:35 IST

ज्या माणसाचे मन खंबीर असते त्याला कोणत्याच औषधाची गरज भासत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : आपल्या जीवनात निष्ठेला खूप महत्त्व असते. माणूस मृत्यूला खूपच घाबरतो. ज्या माणसाचे मन खंबीर असते त्याला कोणत्याच औषधाची गरज भासत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले.अंबड येथे यशवंत व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प शनिवारी रात्री गजानन वाव्हळ यांनी गुंफले. वाव्हळ यांनी संत तुकोबारायांच्या गाथेतील शिवदर्शन मार्गदर्शन केले. आजच्या तरूणाईला व्यसन बसू देत नाही. त्यामुळे युवकांनी युवकांनी तुकोबारायांचे विचार आत्मसात करावेत. अधिकाधिक वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी. ज्यांच्याकडे विचारांचा ठेवा असेल तोच जगात श्रेष्ठ ठरेल. उंच झेप घ्यायची असेल तर चार पावले मागे घ्यायला शिका. सर्व संत त्यांच्या जागी श्रेष्ठ असून, जे युवक आई-वडिलांची सेवा करतात त्यांना देवळात जाण्याची गरज नाही.या व्याख्यान कार्यक्रमास माजी आमदार शिवाजी चोथे, पंचायत समितीचे सभापती भागवत रक्ताटे, राजेंद्र डहाळे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानासह अंबड शहरासह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. शेवटी हरिश्चंद्र शिरसाठ यांनी उपस्थितांचे आभार मानले.शिवाजी महाराज, तुकोबांच्या नात्याचा उलगडासंस्कारांची शिदोरी १६ व्या शतकात आपल्याला दिली ते म्हणजे छत्रपती शिवरायांची. छत्रपती शिवरायांनी जाती-पातीची बंधने तोडून अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित आणून स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, मराठी माणसाचे राज्य हे त्यांनी सर्वांच्या मनावर बिंबविले. प्रत्येक पुरूष आप आपल्या ठिकाणी श्रेष्ठ असतो. आई-वडिलांना देव मानले तर देवळात जाण्याची गरज नाही, हे सांगतानाच संत तुकाराम यांच्या काही अभंगातून छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा यांच्या नात्यांचा उलगडा करत वाव्हळ यांनी आपल्या व्याख्यानात शिवदर्शन घडविले. शिवाय विविध विषयांवर वाव्हळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, अंबड येथील यशवंत व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने पुढील काळात विविध वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.नागरिकांचा प्रतिसादअंबड येथे गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या व्याख्यान कार्यक्रमास शहर आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी लेखक अरविंद जगताप यांचे व्याख्यान झाले. तर शनिवारी आयोजित गजानन वाव्हाळ यांच्या व्याख्यानासही युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.

टॅग्स :SocialसामाजिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजsant tukaramसंत तुकाराम