शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

मन खंबीर असेल तर औषधाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:35 IST

ज्या माणसाचे मन खंबीर असते त्याला कोणत्याच औषधाची गरज भासत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : आपल्या जीवनात निष्ठेला खूप महत्त्व असते. माणूस मृत्यूला खूपच घाबरतो. ज्या माणसाचे मन खंबीर असते त्याला कोणत्याच औषधाची गरज भासत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले.अंबड येथे यशवंत व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प शनिवारी रात्री गजानन वाव्हळ यांनी गुंफले. वाव्हळ यांनी संत तुकोबारायांच्या गाथेतील शिवदर्शन मार्गदर्शन केले. आजच्या तरूणाईला व्यसन बसू देत नाही. त्यामुळे युवकांनी युवकांनी तुकोबारायांचे विचार आत्मसात करावेत. अधिकाधिक वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी. ज्यांच्याकडे विचारांचा ठेवा असेल तोच जगात श्रेष्ठ ठरेल. उंच झेप घ्यायची असेल तर चार पावले मागे घ्यायला शिका. सर्व संत त्यांच्या जागी श्रेष्ठ असून, जे युवक आई-वडिलांची सेवा करतात त्यांना देवळात जाण्याची गरज नाही.या व्याख्यान कार्यक्रमास माजी आमदार शिवाजी चोथे, पंचायत समितीचे सभापती भागवत रक्ताटे, राजेंद्र डहाळे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानासह अंबड शहरासह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. शेवटी हरिश्चंद्र शिरसाठ यांनी उपस्थितांचे आभार मानले.शिवाजी महाराज, तुकोबांच्या नात्याचा उलगडासंस्कारांची शिदोरी १६ व्या शतकात आपल्याला दिली ते म्हणजे छत्रपती शिवरायांची. छत्रपती शिवरायांनी जाती-पातीची बंधने तोडून अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित आणून स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, मराठी माणसाचे राज्य हे त्यांनी सर्वांच्या मनावर बिंबविले. प्रत्येक पुरूष आप आपल्या ठिकाणी श्रेष्ठ असतो. आई-वडिलांना देव मानले तर देवळात जाण्याची गरज नाही, हे सांगतानाच संत तुकाराम यांच्या काही अभंगातून छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा यांच्या नात्यांचा उलगडा करत वाव्हळ यांनी आपल्या व्याख्यानात शिवदर्शन घडविले. शिवाय विविध विषयांवर वाव्हळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, अंबड येथील यशवंत व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने पुढील काळात विविध वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.नागरिकांचा प्रतिसादअंबड येथे गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या व्याख्यान कार्यक्रमास शहर आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी लेखक अरविंद जगताप यांचे व्याख्यान झाले. तर शनिवारी आयोजित गजानन वाव्हाळ यांच्या व्याख्यानासही युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.

टॅग्स :SocialसामाजिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजsant tukaramसंत तुकाराम