शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

मन खंबीर असेल तर औषधाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:35 IST

ज्या माणसाचे मन खंबीर असते त्याला कोणत्याच औषधाची गरज भासत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : आपल्या जीवनात निष्ठेला खूप महत्त्व असते. माणूस मृत्यूला खूपच घाबरतो. ज्या माणसाचे मन खंबीर असते त्याला कोणत्याच औषधाची गरज भासत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले.अंबड येथे यशवंत व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प शनिवारी रात्री गजानन वाव्हळ यांनी गुंफले. वाव्हळ यांनी संत तुकोबारायांच्या गाथेतील शिवदर्शन मार्गदर्शन केले. आजच्या तरूणाईला व्यसन बसू देत नाही. त्यामुळे युवकांनी युवकांनी तुकोबारायांचे विचार आत्मसात करावेत. अधिकाधिक वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी. ज्यांच्याकडे विचारांचा ठेवा असेल तोच जगात श्रेष्ठ ठरेल. उंच झेप घ्यायची असेल तर चार पावले मागे घ्यायला शिका. सर्व संत त्यांच्या जागी श्रेष्ठ असून, जे युवक आई-वडिलांची सेवा करतात त्यांना देवळात जाण्याची गरज नाही.या व्याख्यान कार्यक्रमास माजी आमदार शिवाजी चोथे, पंचायत समितीचे सभापती भागवत रक्ताटे, राजेंद्र डहाळे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानासह अंबड शहरासह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. शेवटी हरिश्चंद्र शिरसाठ यांनी उपस्थितांचे आभार मानले.शिवाजी महाराज, तुकोबांच्या नात्याचा उलगडासंस्कारांची शिदोरी १६ व्या शतकात आपल्याला दिली ते म्हणजे छत्रपती शिवरायांची. छत्रपती शिवरायांनी जाती-पातीची बंधने तोडून अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित आणून स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, मराठी माणसाचे राज्य हे त्यांनी सर्वांच्या मनावर बिंबविले. प्रत्येक पुरूष आप आपल्या ठिकाणी श्रेष्ठ असतो. आई-वडिलांना देव मानले तर देवळात जाण्याची गरज नाही, हे सांगतानाच संत तुकाराम यांच्या काही अभंगातून छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा यांच्या नात्यांचा उलगडा करत वाव्हळ यांनी आपल्या व्याख्यानात शिवदर्शन घडविले. शिवाय विविध विषयांवर वाव्हळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, अंबड येथील यशवंत व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने पुढील काळात विविध वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.नागरिकांचा प्रतिसादअंबड येथे गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या व्याख्यान कार्यक्रमास शहर आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी लेखक अरविंद जगताप यांचे व्याख्यान झाले. तर शनिवारी आयोजित गजानन वाव्हाळ यांच्या व्याख्यानासही युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.

टॅग्स :SocialसामाजिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजsant tukaramसंत तुकाराम