जालना : जालन्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी पैशांमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी व विद्यार्थ्यांना जई, नीट सीईटी परीक्षेची तयारी करण्यासाठी शिवाजी पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी पीएफसी सेंटर सुरू केले. पाहता पाहता या सेंटरने मोठी प्रगती साधली असून, तज्ज्ञ मार्गदर्शक, मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी कोटा किंवा इतर शहरात जाण्याची गरज पडणार नाही, असे प्रतिपादन मध्य प्रदेशातील डिव्हिजनल कमिशन रमण कुमार यांनी केले.
शहरातील पाटील फाउंडेशन सेंटरच्या वतीने शहरातील पालक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमण कुमार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष रवि राऊत, इस्कॉनचे प्रमुख राधेगोविंद, दशरथ राठोड, सुदर्शन उबाले, अकबर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बायोलॉजीचे मनीषकुमार, नागेश पांडेय यांनी जालन्यातील १०० होतकरू मुलांना पीफसीकडून मोफत शिकवणी दिली जाणार असल्याचे सांगितले. तसेच पीएफसीमध्ये मनीष कुमार, नागेश पांडे, अभयकुमार, दीपक कुमार हे तज्ज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून, कमी शुल्कात निवास, मेस, पूर्णवेळ अभ्यासिका उपलब्ध करून दिली असल्याची माहिती संस्थाचालक शिवाजी पाटील, कृष्णा म्हस्के, सचिन गिरी यांनी दिली.
फोटो