शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पिटलाइनमुळे जालन्यातून सुटणार नवीन रेल्वे: रावसाहेब दानवे

By विजय मुंडे  | Updated: March 13, 2024 19:33 IST

जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते.

जालना : पायाभूत सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तोपर्यंत जिल्ह्याचा विकास होत नाही. त्यामुळे आपण रेल्वे विभागासह विद्युत, सिंचन, रस्त्यांची अधिकाधिक कामे करण्यावर भर दिला आहे. त्यातून पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढील काळ हा अमृतमहोत्सवाचा काळ असल्याचे सांगितले आहे. या काळात देशाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यावर त्यांचा भर राहणार असून, यात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. पिटलाईन सुरू झाल्याने जालना रेल्वे स्थानकातून नवीन रेल्वे सुटणार असल्याचेही ते म्हणाले.

जालना येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात १०० कोटी रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या पिटलाईनचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी रेल्वे विभागाच्या डीआरएम नीती सरकार, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उद्योजक घनश्याम गोयल, बद्री पठाडे, सिद्धिविनायक मुळे, भास्कर दानवे, आदींची उपस्थिती होती.

जोपर्यंत पिटलाईनची सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत जालन्यातून नवीन गाड्या सोडणे शक्य नव्हते. पिटलाईनमुळे जालना येथून नवीन गाड्या सोडता येणार आहेत. जालन्यात कामाला येणाऱ्या बिहार, उत्तर प्रदेशातील कामगारांसाठी सुरू झालेली छपरा गाडी महत्त्वाची ठरणार आहे. तिरूपती, जनशताब्दी, वंदे भारतही जालन्यातून सुरू केली आहे. मनमाड, नांदेड येथून गाड्या मेन्टेनन्ससाठी येणार आहेत. त्यामुळे रोजगारही उपलब्ध होणार आहे. जालन्यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथेही पिटलाईन झाल्याचेही दानवे यांनी सांगितले. संजय देठे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.

मैलाचा दगड रोवला गेला : चव्हाणजिल्ह्याच्या इतिहासात आज एक मैलाचा दगड रोवला गेला आहे. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून अनेक रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. पिटलाईन महत्त्वाची ठरणार आहे. सात-आठ वर्षाच्या कालखंडात जिल्ह्याचा गतीने विकास झाला आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकासाचा आलेख वाढतच राहील, असा विश्वास माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाrailwayरेल्वे