शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:30 IST

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या आठवड्यात काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. मंठा तसेच जालन्यात झालेल्या दोन्ही सभांना काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ज्या उत्साहाने हजेरी लावली त्यातून काँग्रेसला पुन्हा अच्छे दिनची आशा पल्लवित झाली आहे.जालना जिल्ह्यात गेल्या काहीवर्षांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली होती. परंतु थेट नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या निवडणुकीत आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोठे यश मिळविले. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या आहेत.एकूणच लोकसभेचा अपवाद वगळता काँग्रेसने युतीसोबत दोन हात करून आपले अस्तित्व सिध्द केले आहे. जालन्यात माजी आ. कैलास गोरंट्याल आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जणूकाही खो-खो चा सामानाच रंगतो. याला अपवाद केवळ २००९ चा म्हणावा लागेल. त्यावेळी अर्जुन खोतकर यांनी विधानसभेची निवडणुक ही घनसावंगी मतदार संघातून लढविल होती. त्यांनी तेथे देखील ८३ हजार मते मिळवून राज्यात शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपेक्षा जास्त मतदान खेचले होते.२९१४ ची निवडणुकीही कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर तसेच अरविंद चव्हाण यांच्यात चुरशीची झाली होती. ऐन वेळी भाजपने युती तोडल्याचा सर्वात जास्त फायदा हा अर्जुन खोतकरांना झाला आणि त्यांनी बाजी मारली. अरविंद चव्हाण यांना भाजपने उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळली होती. आता पुन्हा निवडणुकीचे नगारे वाजण्यास प्रारंभ झाला आहे. आधी दिल्लीसाठीच्या निवडणुकांपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत.शिवसेने सोबत भाजपला युती करण्याची गरज आता चांगलीच जाणवू लागली असून, त्यांच्या शिवसेनेविषयच्या भूमिकेत यू-र्टन आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्ते अद्यापही संभ्रमात असून, युती होते की, स्वतंत्र लढतात याकडे भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. मध्यंतरी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाच्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. राजेश टोपेंना लोकसभेची संधी पुन्ह देण्याविषयी चाचपणी केली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडवून घेऊन त्यात एक तर राजेश टोपे किंवा आ. सतीश चव्हाण यांना उमेदवारी देऊन राजकीय जुगार खेळण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी कैलास गोरंट्याल आणि माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांची तोंड भरून स्तुती केल्याने काँग्रेसमध्ये अद्यापही कैलास गोरंट्याल यांचा शब्द महत्वाचा ठरतो, हे दिसून आले. त्यामुळे जनसंघर्ष यात्रेमुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य अवतरल्यास नवल वाटू नये, परंतु या चैतन्याच्या वातावरणात काँग्रेसच्या नेतृत्वाला सातत्य ठेवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.

टॅग्स :Congress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाण