शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:30 IST

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या आठवड्यात काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. मंठा तसेच जालन्यात झालेल्या दोन्ही सभांना काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ज्या उत्साहाने हजेरी लावली त्यातून काँग्रेसला पुन्हा अच्छे दिनची आशा पल्लवित झाली आहे.जालना जिल्ह्यात गेल्या काहीवर्षांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली होती. परंतु थेट नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या निवडणुकीत आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोठे यश मिळविले. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या आहेत.एकूणच लोकसभेचा अपवाद वगळता काँग्रेसने युतीसोबत दोन हात करून आपले अस्तित्व सिध्द केले आहे. जालन्यात माजी आ. कैलास गोरंट्याल आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जणूकाही खो-खो चा सामानाच रंगतो. याला अपवाद केवळ २००९ चा म्हणावा लागेल. त्यावेळी अर्जुन खोतकर यांनी विधानसभेची निवडणुक ही घनसावंगी मतदार संघातून लढविल होती. त्यांनी तेथे देखील ८३ हजार मते मिळवून राज्यात शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपेक्षा जास्त मतदान खेचले होते.२९१४ ची निवडणुकीही कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर तसेच अरविंद चव्हाण यांच्यात चुरशीची झाली होती. ऐन वेळी भाजपने युती तोडल्याचा सर्वात जास्त फायदा हा अर्जुन खोतकरांना झाला आणि त्यांनी बाजी मारली. अरविंद चव्हाण यांना भाजपने उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळली होती. आता पुन्हा निवडणुकीचे नगारे वाजण्यास प्रारंभ झाला आहे. आधी दिल्लीसाठीच्या निवडणुकांपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत.शिवसेने सोबत भाजपला युती करण्याची गरज आता चांगलीच जाणवू लागली असून, त्यांच्या शिवसेनेविषयच्या भूमिकेत यू-र्टन आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्ते अद्यापही संभ्रमात असून, युती होते की, स्वतंत्र लढतात याकडे भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. मध्यंतरी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाच्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. राजेश टोपेंना लोकसभेची संधी पुन्ह देण्याविषयी चाचपणी केली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडवून घेऊन त्यात एक तर राजेश टोपे किंवा आ. सतीश चव्हाण यांना उमेदवारी देऊन राजकीय जुगार खेळण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी कैलास गोरंट्याल आणि माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांची तोंड भरून स्तुती केल्याने काँग्रेसमध्ये अद्यापही कैलास गोरंट्याल यांचा शब्द महत्वाचा ठरतो, हे दिसून आले. त्यामुळे जनसंघर्ष यात्रेमुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य अवतरल्यास नवल वाटू नये, परंतु या चैतन्याच्या वातावरणात काँग्रेसच्या नेतृत्वाला सातत्य ठेवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.

टॅग्स :Congress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाण