शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
3
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
4
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
5
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
6
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
7
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
8
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
9
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
10
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
11
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
12
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
13
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
14
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
15
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
16
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
17
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
18
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
19
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
20
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज- नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तथा प्रसिध्द करणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तथा प्रसिध्द करणे हा हेतू ठेवू नये, जेवढे आपल्या मुठीत बसते तेवढेच आपले असते, मुठीत बसण्यापेक्षा आपल्याकडे जास्त असल्यास ते इतरांना द्यावे, दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना देवाने चांगला पाऊस पाडून भरभरून द्यावे एवढेच आपण आकाशतील शक्तीकडे मागत असल्याचे सांगून नाना पाटेकर यांनी सर्वांना भावूक केले.निमित्त होते ते येथील भाईश्री फाऊंडेशनच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे. मंगळवारी दानकुंवरच्या मैदानावर नाम फाऊंडेशन आणि भाईश्री परिवाराकडून ४८ जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटात पार पडला. यावेळी प्रसिध्द कलावंत नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेष महाराज गोंदीकर यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी सांगिले की, समाजात अनेक प्रश्न, समस्या आहेत, ते सर्वांनी मिळून सोडवाच्या आहेत. त्यासाठीच आम्ही नाम फाऊंडेशनची स्थापना केली आहे. यातून आम्हाला मनस्वी आनंद मिळतो. गरिबांना दानशूर व्यक्तींकडून मोठी आशा असते, आणि येथे या सोहळ्यास भाईश्रींनी सांगितल्या प्रमाणे सर्व समाज घटकांनी मदत केल्याचे ऐकल्यावर मनाला खूप समाधान वाटल्याने पाटेकर म्हणाले.अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या खास शैलीत व्यासपीठावरील उपस्थित नव वधू-वरांनी त्यांच्या चेहºयावर हास्य आणावे, नंतर उद्यापासून तुमचे हास्य लोप पावेल असा सांगून गंभीर वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी राम..राम.. मंडळी अशी हाक देऊन दोन्ही हात जोडून उपस्थितांना अभिवादन केले.यावेळी नाम च्या माध्यमातून राज्यातील तीन हजार २०० सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाम फाऊंडेशनचा सहभाग असल्याचे सांगितले. सामूहिक विवाह चळवळ आता जोर धरू लागल्याचे समाधान व्यक्त केले. सोलापूर येथे एका मुलीच्या आई-वडिलांनी दहा हजार रूपये दिल्याची आठवण आपल्या मनात कोरल्याचे ते म्हणाले.मैत्र मांदियाळीस ११०० क्विंटल तांदूळया सामूहिक विवाह सोहळ्यात तांदळाच्या अक्षतां ऐवजी गुलाब पुष्पाच्या पाकळ्या देण्यात आल्या होत्या. अक्षतांसाठी लागणारा तांदूळ हा वाया जातो. तो वाया जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.ही बाब लक्षात घेऊन मैत्र मांदियाळीकडून ज्या गोरगरिबांना भोजन व्यवस्था केली जाते. त्यासाठी भाईश्री परिवाराकडून ११०० क्विंटल तांदूळ देण्यात आला. यावेळी मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांचा नाना पाटेकर यांनी सत्कार केला.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिकNana Patekarनाना पाटेकरMakrand Anaspureमकरंद अनासपुरे