शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज- नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तथा प्रसिध्द करणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तथा प्रसिध्द करणे हा हेतू ठेवू नये, जेवढे आपल्या मुठीत बसते तेवढेच आपले असते, मुठीत बसण्यापेक्षा आपल्याकडे जास्त असल्यास ते इतरांना द्यावे, दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना देवाने चांगला पाऊस पाडून भरभरून द्यावे एवढेच आपण आकाशतील शक्तीकडे मागत असल्याचे सांगून नाना पाटेकर यांनी सर्वांना भावूक केले.निमित्त होते ते येथील भाईश्री फाऊंडेशनच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे. मंगळवारी दानकुंवरच्या मैदानावर नाम फाऊंडेशन आणि भाईश्री परिवाराकडून ४८ जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटात पार पडला. यावेळी प्रसिध्द कलावंत नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेष महाराज गोंदीकर यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी सांगिले की, समाजात अनेक प्रश्न, समस्या आहेत, ते सर्वांनी मिळून सोडवाच्या आहेत. त्यासाठीच आम्ही नाम फाऊंडेशनची स्थापना केली आहे. यातून आम्हाला मनस्वी आनंद मिळतो. गरिबांना दानशूर व्यक्तींकडून मोठी आशा असते, आणि येथे या सोहळ्यास भाईश्रींनी सांगितल्या प्रमाणे सर्व समाज घटकांनी मदत केल्याचे ऐकल्यावर मनाला खूप समाधान वाटल्याने पाटेकर म्हणाले.अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या खास शैलीत व्यासपीठावरील उपस्थित नव वधू-वरांनी त्यांच्या चेहºयावर हास्य आणावे, नंतर उद्यापासून तुमचे हास्य लोप पावेल असा सांगून गंभीर वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी राम..राम.. मंडळी अशी हाक देऊन दोन्ही हात जोडून उपस्थितांना अभिवादन केले.यावेळी नाम च्या माध्यमातून राज्यातील तीन हजार २०० सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाम फाऊंडेशनचा सहभाग असल्याचे सांगितले. सामूहिक विवाह चळवळ आता जोर धरू लागल्याचे समाधान व्यक्त केले. सोलापूर येथे एका मुलीच्या आई-वडिलांनी दहा हजार रूपये दिल्याची आठवण आपल्या मनात कोरल्याचे ते म्हणाले.मैत्र मांदियाळीस ११०० क्विंटल तांदूळया सामूहिक विवाह सोहळ्यात तांदळाच्या अक्षतां ऐवजी गुलाब पुष्पाच्या पाकळ्या देण्यात आल्या होत्या. अक्षतांसाठी लागणारा तांदूळ हा वाया जातो. तो वाया जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.ही बाब लक्षात घेऊन मैत्र मांदियाळीकडून ज्या गोरगरिबांना भोजन व्यवस्था केली जाते. त्यासाठी भाईश्री परिवाराकडून ११०० क्विंटल तांदूळ देण्यात आला. यावेळी मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांचा नाना पाटेकर यांनी सत्कार केला.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिकNana Patekarनाना पाटेकरMakrand Anaspureमकरंद अनासपुरे