शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज- नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तथा प्रसिध्द करणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय तथा प्रसिध्द करणे हा हेतू ठेवू नये, जेवढे आपल्या मुठीत बसते तेवढेच आपले असते, मुठीत बसण्यापेक्षा आपल्याकडे जास्त असल्यास ते इतरांना द्यावे, दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना देवाने चांगला पाऊस पाडून भरभरून द्यावे एवढेच आपण आकाशतील शक्तीकडे मागत असल्याचे सांगून नाना पाटेकर यांनी सर्वांना भावूक केले.निमित्त होते ते येथील भाईश्री फाऊंडेशनच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे. मंगळवारी दानकुंवरच्या मैदानावर नाम फाऊंडेशन आणि भाईश्री परिवाराकडून ४८ जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटात पार पडला. यावेळी प्रसिध्द कलावंत नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेष महाराज गोंदीकर यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी सांगिले की, समाजात अनेक प्रश्न, समस्या आहेत, ते सर्वांनी मिळून सोडवाच्या आहेत. त्यासाठीच आम्ही नाम फाऊंडेशनची स्थापना केली आहे. यातून आम्हाला मनस्वी आनंद मिळतो. गरिबांना दानशूर व्यक्तींकडून मोठी आशा असते, आणि येथे या सोहळ्यास भाईश्रींनी सांगितल्या प्रमाणे सर्व समाज घटकांनी मदत केल्याचे ऐकल्यावर मनाला खूप समाधान वाटल्याने पाटेकर म्हणाले.अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या खास शैलीत व्यासपीठावरील उपस्थित नव वधू-वरांनी त्यांच्या चेहºयावर हास्य आणावे, नंतर उद्यापासून तुमचे हास्य लोप पावेल असा सांगून गंभीर वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी राम..राम.. मंडळी अशी हाक देऊन दोन्ही हात जोडून उपस्थितांना अभिवादन केले.यावेळी नाम च्या माध्यमातून राज्यातील तीन हजार २०० सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाम फाऊंडेशनचा सहभाग असल्याचे सांगितले. सामूहिक विवाह चळवळ आता जोर धरू लागल्याचे समाधान व्यक्त केले. सोलापूर येथे एका मुलीच्या आई-वडिलांनी दहा हजार रूपये दिल्याची आठवण आपल्या मनात कोरल्याचे ते म्हणाले.मैत्र मांदियाळीस ११०० क्विंटल तांदूळया सामूहिक विवाह सोहळ्यात तांदळाच्या अक्षतां ऐवजी गुलाब पुष्पाच्या पाकळ्या देण्यात आल्या होत्या. अक्षतांसाठी लागणारा तांदूळ हा वाया जातो. तो वाया जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.ही बाब लक्षात घेऊन मैत्र मांदियाळीकडून ज्या गोरगरिबांना भोजन व्यवस्था केली जाते. त्यासाठी भाईश्री परिवाराकडून ११०० क्विंटल तांदूळ देण्यात आला. यावेळी मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांचा नाना पाटेकर यांनी सत्कार केला.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिकNana Patekarनाना पाटेकरMakrand Anaspureमकरंद अनासपुरे