शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणी आयोगाची अंमलबजावणी विचारांती करण्याची गरज - चितळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST

गेल्याच महिन्यात जालना येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणासह जातीनिहाय जनगणनेसाठी मोर्चा काढला होता. हा राज्यातील पहिला मोर्चा होता. हा मोर्चा ...

गेल्याच महिन्यात जालना येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणासह जातीनिहाय जनगणनेसाठी मोर्चा काढला होता. हा राज्यातील पहिला मोर्चा होता. हा मोर्चा यशस्वी करून आंदोलनाची ठिणगी जालन्यातून पेटली आहे. ओबीसी समाज हा संपूर्ण देश आणि राज्यात विखुरलेला आहे. त्यांची एकत्रित मोट बांधण्यासाठी समाजातील अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ नेते आपले सर्वस्व पणाला लावत आहेत.

आपण ओबीसी समाजाचा एक घटक असून, त्या दृष्टीने शक्य तेवढे योगदान समाजासाठी देत असल्याचे चितळकर म्हणाले. दरम्यान रोहिणी आयोगाने केंद्रीय जातींच्या यादीतील जवळपास साडेतीन हजार विविध जातींची वर्गवारी केली आहे. त्यातून ओबीसीतीलच कुठल्या जातीला आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, तर कुठल्या जातीला आरक्षणाचा कमी लाभ मिळाला आहे. याचे पृथक्करण न्यायमूर्ती रोहिणी आयोगाने केले आहे. त्यानुसार जातींची एक ते चार अशी वर्गवारी केली आहे; परंतु ही वर्गवारी नेमकी समाजाच्या हिताची आहे की समाजात दुही निर्माण करणारी ठरेल, यावर समाजाच्या व्यासपीठावर चर्चा होणे अपेक्षित आहे. सर्वात प्रथम रोहिणी आयोग लागू करताना धाईत निर्णय घेणे चुकीचे ठरणार असून, आधी ओबीसीची जातनिहाय जनगणना हाच त्यासाठी ठोस पर्याय असल्याचेही चितळकर यांनी सांगितले.

चौकट

महाज्याेतीच्या माध्यमातून मोठ्या संधी

राज्य सरकारने ओबीसींसाठी महाज्योती संस्थेची स्थापना केली आहे. त्याचे संचालक पद हे योगायोगाने जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते लक्ष्मण वडले यांना मिळाले आहे. ही बाब जालन्यासाठी गौरवाची म्हणावी लागेल. या संस्थेला सारथीच्या धर्तीवर निधी दिल्यास ओबीसी समाजातील युवकांना छोटे-मोठे व्यवसाय, उद्योग स्थापन करण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे महाज्योतीच्या माध्यमातून अनेक संधी मिळू शकतात, असेही चितळकर यांनी नमूद केले आहे. त्यांनी न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या मुद्यावरून लोकमत कार्यालयात भेट देऊन आपले सविस्तर मत मांडले आहे.