शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र उत्सवाची जिल्हाभर धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:28 IST

गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरत्र उत्सवास प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरत्र उत्सवास प्रारंभ झाला. जालना शहरातही सकाळपासूनच सार्वजनिक दुर्गा मंडळांनी वाजतगाजत मूर्तीची मिरणूक काढून देवीच स्थापना केली. अंबड, सोमठाणा, मंठा पिंपळगाव रेणुकाई तसेच अन्य प्रसिद्ध देवी मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. या उत्सवानिमित्त ठिकठिकाणी मोठी यात्रा भरते. जालन्यातही दुर्गादेवी मंदिर, मंमादेवी मंदिर, काळुंका माता मंदिर, तुळजाभवानी मंदिरातही घटस्थापना करण्यात आली.परतीच्या पावसाने नवरात्र उत्सवाचा आनंद व्दिगुणित केला आहे. पिक परिस्थिती चांगली असल्याने शेतकरी देखील समाधानी आहेत. त्यातच आदीशक्तीचा उत्सव म्हणून या नवरात्र उत्सवाकडे पाहिले जाते. या काळा विविध देवींचे मंदिर-ठाणे येथे यात्रा भरतात. गणेश मंडळांप्रमाणे दुर्गा देवी बसविण्याची पध्दत आपल्याकडेही आता चांगलीच रूजली आहे. जालन्यातील विविध भागात युवकांनी आकर्षक विद्युत रोषणाई करून देवींची स्थापना केली आहे.यंदा दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात मंदिरांमध्ये रविवारी सकाळी अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली.दररोज दुपारी आणि रात्री भजन, पूजन तसेच देवीचा गोंधळ घालण्याची पंरपरा आहे. अंबड येथील मत्स्योदरी देवी संस्थानमध्येही रविवारी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंठा येथील रेणुका देवी संस्थानमध्येही उत्सवास पंरपरागत पध्दतीने प्रारंभ झाला. बदनापूर जवळील सोमठाणा येथील मंदिरातही उत्सवास घटस्थापना करून सुरूवात करण्यात आली. जालन्यातील गांधी चमन येथील काळुंका माता मंदिर, मळ्यातील तुळजा भवानी मंदिरातही उत्सवास प्रारंभ झाला आहे.नवीन जालना भागातील दुर्गादेवीची मोठी यात्र दरवर्षी नवरात्रात भरते. या भागात रविवारी सायंकाळी पथदिवे बंद होते. तसेच या भागातून जाणा-या वाहतुकीचे नियोजनही कोलमडले होते. नवत्र उत्सवाची रविवारी पहिली माळ असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यातच महिलांची गर्दी ही लक्षणीय होती.या महत्त्वाच्या यात्रेकडे जिल्हाधिकारी तसेच जालना पालिकेने लक्ष देणे अपेक्षित होते असे अनेक भाविकांनी सांगितले. किमान पुढील नऊ दिवस तरी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून या भागातील पथदिवे तसेच वाहतूकची व्यवस्था स्वतंत्र करावी अशी मागणीही अनेकांनी केली आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रम