शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नवरात्र उत्सवाची जिल्हाभर धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:28 IST

गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरत्र उत्सवास प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरत्र उत्सवास प्रारंभ झाला. जालना शहरातही सकाळपासूनच सार्वजनिक दुर्गा मंडळांनी वाजतगाजत मूर्तीची मिरणूक काढून देवीच स्थापना केली. अंबड, सोमठाणा, मंठा पिंपळगाव रेणुकाई तसेच अन्य प्रसिद्ध देवी मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. या उत्सवानिमित्त ठिकठिकाणी मोठी यात्रा भरते. जालन्यातही दुर्गादेवी मंदिर, मंमादेवी मंदिर, काळुंका माता मंदिर, तुळजाभवानी मंदिरातही घटस्थापना करण्यात आली.परतीच्या पावसाने नवरात्र उत्सवाचा आनंद व्दिगुणित केला आहे. पिक परिस्थिती चांगली असल्याने शेतकरी देखील समाधानी आहेत. त्यातच आदीशक्तीचा उत्सव म्हणून या नवरात्र उत्सवाकडे पाहिले जाते. या काळा विविध देवींचे मंदिर-ठाणे येथे यात्रा भरतात. गणेश मंडळांप्रमाणे दुर्गा देवी बसविण्याची पध्दत आपल्याकडेही आता चांगलीच रूजली आहे. जालन्यातील विविध भागात युवकांनी आकर्षक विद्युत रोषणाई करून देवींची स्थापना केली आहे.यंदा दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात मंदिरांमध्ये रविवारी सकाळी अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली.दररोज दुपारी आणि रात्री भजन, पूजन तसेच देवीचा गोंधळ घालण्याची पंरपरा आहे. अंबड येथील मत्स्योदरी देवी संस्थानमध्येही रविवारी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंठा येथील रेणुका देवी संस्थानमध्येही उत्सवास पंरपरागत पध्दतीने प्रारंभ झाला. बदनापूर जवळील सोमठाणा येथील मंदिरातही उत्सवास घटस्थापना करून सुरूवात करण्यात आली. जालन्यातील गांधी चमन येथील काळुंका माता मंदिर, मळ्यातील तुळजा भवानी मंदिरातही उत्सवास प्रारंभ झाला आहे.नवीन जालना भागातील दुर्गादेवीची मोठी यात्र दरवर्षी नवरात्रात भरते. या भागात रविवारी सायंकाळी पथदिवे बंद होते. तसेच या भागातून जाणा-या वाहतुकीचे नियोजनही कोलमडले होते. नवत्र उत्सवाची रविवारी पहिली माळ असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यातच महिलांची गर्दी ही लक्षणीय होती.या महत्त्वाच्या यात्रेकडे जिल्हाधिकारी तसेच जालना पालिकेने लक्ष देणे अपेक्षित होते असे अनेक भाविकांनी सांगितले. किमान पुढील नऊ दिवस तरी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून या भागातील पथदिवे तसेच वाहतूकची व्यवस्था स्वतंत्र करावी अशी मागणीही अनेकांनी केली आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रम