शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदी रॉकेट तर फडणवीस बॉम्ब, दानवेंची पवारांना 'ही' उपमा, शिवसेनेवरही बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 09:40 IST

रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जालना - दिवाळीचा सण आनंदाचा, उत्सवाचा आणि फटाके फोडण्याचा असतो. प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. गरीब झोपडीपासून ते श्रीमंताच्या बंगल्यातही या सणाचा अधिक असतो. अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरी करत प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व या सणाला आहे. सेलिब्रिटी, राजकारणीही दिवाळीच्या आनंदात राजकारण बाजूला ठेऊन हे क्षण साजरे करतात. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनीही आपल्या कुटुंबीयांसोबत गावाकडे दिवाळी साजरी केली. यावेळी, पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राजकीय फटाके फोडले. राजकीय नेत्यांना फटाक्यांची उमपा देत माळच लावली.  

रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर भाऊबीज निमित्ताने त्यांच्या बहिणीने दानवे यांना औक्षण करून भावांच्या दीर्घ आयुष्यासाठी व त्याला सुख, शांती आणि समृद्धीची भरभराट लाभो यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. याप्रसंगी पत्रकाराने दिवाळीचे फटाके आणि राजकारणी असं समीकरण जुळवत प्रश्न विचारला. त्यावेळी, रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवाळीच्या फटाक्यांमधील रॉकेट असून देवेंद्र फडणवीस हे अॅटम बॉम्ब असल्याचं म्हटलं. त्यासोबतच, इतरही राजकीय पक्षांना फटाक्यांची उपमा देताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे रॉकेट नेते असून, अॅटम बॉम्ब देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे रॉकेट आणि अॅटम बॉम्ब फक्त आमच्याजवळ  आहे. सध्या राजकारणात लवंगी फटाके खूप झाले आहेत, प्रत्येक पक्षात असे लवंगी फटाके आहेत. तर फटाक्यांची लड म्हणजे मनसे असून, एकदा फुटायला लागली की थांबतच नाही. या लडमधील फटाका फुटतो पण फायदा काही होत नाही. फक्त आवाज येतो, असे म्हणत मनसेचं कौतुक अन् टीकाही केली. तर आवाज देणारा खाकी फटका म्हणजे आपल्या राज्यात शरद पवार यांना म्हणता येईल. तसेच उध्दव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे फुसका फटका असल्याची बोचरी टीका दानवे यांनी केली. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही राजकीय पक्षांना फटाक्यांची उमपा दिली. 

अडीच वर्षात एकदाही आवाज नाही

अडीच वर्षात एकदाही आवाज केला नाही. आता आमचं सरकार आलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले. अडीच वर्षे या राज्याचे वाया गेले. त्यामुळे ज्या सरकारने राज्याच्या जनतेचे अडीच वर्षे वाया घातले त्यांना फुसका फटका म्हणता येईल असे दानवे म्हणाले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेministerमंत्रीSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीDiwaliदिवाळी 2022