शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

मोदी रॉकेट तर फडणवीस बॉम्ब, दानवेंची पवारांना 'ही' उपमा, शिवसेनेवरही बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 09:40 IST

रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जालना - दिवाळीचा सण आनंदाचा, उत्सवाचा आणि फटाके फोडण्याचा असतो. प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. गरीब झोपडीपासून ते श्रीमंताच्या बंगल्यातही या सणाचा अधिक असतो. अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरी करत प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व या सणाला आहे. सेलिब्रिटी, राजकारणीही दिवाळीच्या आनंदात राजकारण बाजूला ठेऊन हे क्षण साजरे करतात. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनीही आपल्या कुटुंबीयांसोबत गावाकडे दिवाळी साजरी केली. यावेळी, पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राजकीय फटाके फोडले. राजकीय नेत्यांना फटाक्यांची उमपा देत माळच लावली.  

रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर भाऊबीज निमित्ताने त्यांच्या बहिणीने दानवे यांना औक्षण करून भावांच्या दीर्घ आयुष्यासाठी व त्याला सुख, शांती आणि समृद्धीची भरभराट लाभो यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. याप्रसंगी पत्रकाराने दिवाळीचे फटाके आणि राजकारणी असं समीकरण जुळवत प्रश्न विचारला. त्यावेळी, रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवाळीच्या फटाक्यांमधील रॉकेट असून देवेंद्र फडणवीस हे अॅटम बॉम्ब असल्याचं म्हटलं. त्यासोबतच, इतरही राजकीय पक्षांना फटाक्यांची उपमा देताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे रॉकेट नेते असून, अॅटम बॉम्ब देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे रॉकेट आणि अॅटम बॉम्ब फक्त आमच्याजवळ  आहे. सध्या राजकारणात लवंगी फटाके खूप झाले आहेत, प्रत्येक पक्षात असे लवंगी फटाके आहेत. तर फटाक्यांची लड म्हणजे मनसे असून, एकदा फुटायला लागली की थांबतच नाही. या लडमधील फटाका फुटतो पण फायदा काही होत नाही. फक्त आवाज येतो, असे म्हणत मनसेचं कौतुक अन् टीकाही केली. तर आवाज देणारा खाकी फटका म्हणजे आपल्या राज्यात शरद पवार यांना म्हणता येईल. तसेच उध्दव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे फुसका फटका असल्याची बोचरी टीका दानवे यांनी केली. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही राजकीय पक्षांना फटाक्यांची उमपा दिली. 

अडीच वर्षात एकदाही आवाज नाही

अडीच वर्षात एकदाही आवाज केला नाही. आता आमचं सरकार आलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले. अडीच वर्षे या राज्याचे वाया गेले. त्यामुळे ज्या सरकारने राज्याच्या जनतेचे अडीच वर्षे वाया घातले त्यांना फुसका फटका म्हणता येईल असे दानवे म्हणाले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेministerमंत्रीSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीDiwaliदिवाळी 2022