शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

"सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा", जरांगेंचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 19:33 IST

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले नाही तर मंडल आयोग चॅलेंज होणार, मनोज जरांगे यांचा इशारा

- पवन पवार वडीगोद्री ( जालना): सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी झाली आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही वकील माझ्यासमोर बसवा आम्हाला कसं आरक्षण मिळत नाही ते सांगा. कुणबी ही मराठ्यांची उपजात आहे. त्यामुळे आम्हाला आऱक्षण दिलंच पाहिजे. नाही तर कुणबी मराठ्यांची उपजात नसल्याचं सिद्ध करा. मग मंडल आयोगही चॅलेंज होईल असं सांगतानाच ज्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही असं वाटत असल तर पार्श्वभागावर लाथ मारून त्यांना हाकला, अशी स्पष्ट भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. सरकारतर्फे आलेल्या तीन आमदारांच्या शिष्टमंडळासोबत अंतरवाली सराटीत  जरांगे यांची आज दुपारी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

मनोज जरांगे यांच्या ७  ऑगस्टच्या दौऱ्यापूर्वी तीन आमदारांचे सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवालीत दाखल झाले. शिष्टमंडळात राजेंद्र राऊत, नारायण कुचे आणि राणा जगजित सिंह यांचा समावेश होता.  त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, १३ ऑगस्टपर्यन्त सरकारला  आमच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे आतापर्यंतचा २ महिने वेळ सरकारला दिला आहे. आरक्षणाच्या अडून आम्हांला राजकारणात जायचं नाही. आम्ही सरकारला संधी दिली आहे. आमच्या मागण्या मान्य करा आम्ही राजकारणात जाणार नाही. जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मग समाजाचं ऐकावे लागेल. कोणतंही काम करायला इच्छा लागते, मात्र सरकारकडे इच्छाशक्ती नाही, असा आरोप जरांगे यांनी केला.

आता आम्ही कोणतेही आरोप सहन करणार नाही२९ तारखेला आपण तोडगा काढू, समाजात फार रोष आहे. फडणवीस यांचं ऐकून मराठयांना वेड्यात काढू नका, एसइबीसी आरक्षणाची मागणी आम्ही केलेली नाही. हे आरक्षण मिळाल्यावर एकाही मराठ्याने गुलाल उधळला नाही. जे आरक्षण रद्द झालं ते दरेकर यांच्यामुळे रद्द झालं. आरक्षण रद्द होण्याला फडणवीस देखील जबाबदार आहेत, अशी टीका आमदार दरेकर व उपमुख्यमंत्री फडणविस यांच्यावर जरांगे यांनी केली.

२९ ऑगस्टला निर्णायक बैठक या महिन्याच्या शेवटी २९ ऑगस्टला दिवसभर बैठक होईल. सगळ्यांनी जेवायचे डबे सोबत आणा. संविस्तार चर्चा करू संध्याकाळी ७ वाजेपर्यत चर्चा करू. आम्हाला पाडनं आणि उभे राहणं हे दोन्हीही सोपे आहे. छत्रपतीचा इतिहास दाखवणाऱ्याला देखील यांनी कोर्टात उभे केले. तुम्ही भाजपचे सगळे सीट पाडून टाकणार आहे. मराठा ,धनगर यांना त्रास कसा देता येईल यासाठी फडणवीस यांनी गृहखाते घेतले. आमच्या विरोधात अभियान सुरू आहे. संधी देणं आमचं काम आहे ज्यावेळी आमचे लोक तिथे बसतील त्यावेळी यांना कळेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

सरसकट आजपर्यंतचे गुन्हे मागे घ्या आमचे लोक नसताना गुन्ह्यात गुंतवले गेले आहेत. यांनी राजकिय द्वेषापोटी गुंतवले आहे.केसेस होण्याला आम्ही घाबरणार नाही. जेवढ्या केसेस झाल्या तेवढं मराठे पेटून उठले. सरसकट गुन्हे मागे घ्या बाकी आम्हाला मान्य नाही. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना