शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा", जरांगेंचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 19:33 IST

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले नाही तर मंडल आयोग चॅलेंज होणार, मनोज जरांगे यांचा इशारा

- पवन पवार वडीगोद्री ( जालना): सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी झाली आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही वकील माझ्यासमोर बसवा आम्हाला कसं आरक्षण मिळत नाही ते सांगा. कुणबी ही मराठ्यांची उपजात आहे. त्यामुळे आम्हाला आऱक्षण दिलंच पाहिजे. नाही तर कुणबी मराठ्यांची उपजात नसल्याचं सिद्ध करा. मग मंडल आयोगही चॅलेंज होईल असं सांगतानाच ज्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही असं वाटत असल तर पार्श्वभागावर लाथ मारून त्यांना हाकला, अशी स्पष्ट भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. सरकारतर्फे आलेल्या तीन आमदारांच्या शिष्टमंडळासोबत अंतरवाली सराटीत  जरांगे यांची आज दुपारी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

मनोज जरांगे यांच्या ७  ऑगस्टच्या दौऱ्यापूर्वी तीन आमदारांचे सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवालीत दाखल झाले. शिष्टमंडळात राजेंद्र राऊत, नारायण कुचे आणि राणा जगजित सिंह यांचा समावेश होता.  त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, १३ ऑगस्टपर्यन्त सरकारला  आमच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे आतापर्यंतचा २ महिने वेळ सरकारला दिला आहे. आरक्षणाच्या अडून आम्हांला राजकारणात जायचं नाही. आम्ही सरकारला संधी दिली आहे. आमच्या मागण्या मान्य करा आम्ही राजकारणात जाणार नाही. जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मग समाजाचं ऐकावे लागेल. कोणतंही काम करायला इच्छा लागते, मात्र सरकारकडे इच्छाशक्ती नाही, असा आरोप जरांगे यांनी केला.

आता आम्ही कोणतेही आरोप सहन करणार नाही२९ तारखेला आपण तोडगा काढू, समाजात फार रोष आहे. फडणवीस यांचं ऐकून मराठयांना वेड्यात काढू नका, एसइबीसी आरक्षणाची मागणी आम्ही केलेली नाही. हे आरक्षण मिळाल्यावर एकाही मराठ्याने गुलाल उधळला नाही. जे आरक्षण रद्द झालं ते दरेकर यांच्यामुळे रद्द झालं. आरक्षण रद्द होण्याला फडणवीस देखील जबाबदार आहेत, अशी टीका आमदार दरेकर व उपमुख्यमंत्री फडणविस यांच्यावर जरांगे यांनी केली.

२९ ऑगस्टला निर्णायक बैठक या महिन्याच्या शेवटी २९ ऑगस्टला दिवसभर बैठक होईल. सगळ्यांनी जेवायचे डबे सोबत आणा. संविस्तार चर्चा करू संध्याकाळी ७ वाजेपर्यत चर्चा करू. आम्हाला पाडनं आणि उभे राहणं हे दोन्हीही सोपे आहे. छत्रपतीचा इतिहास दाखवणाऱ्याला देखील यांनी कोर्टात उभे केले. तुम्ही भाजपचे सगळे सीट पाडून टाकणार आहे. मराठा ,धनगर यांना त्रास कसा देता येईल यासाठी फडणवीस यांनी गृहखाते घेतले. आमच्या विरोधात अभियान सुरू आहे. संधी देणं आमचं काम आहे ज्यावेळी आमचे लोक तिथे बसतील त्यावेळी यांना कळेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

सरसकट आजपर्यंतचे गुन्हे मागे घ्या आमचे लोक नसताना गुन्ह्यात गुंतवले गेले आहेत. यांनी राजकिय द्वेषापोटी गुंतवले आहे.केसेस होण्याला आम्ही घाबरणार नाही. जेवढ्या केसेस झाल्या तेवढं मराठे पेटून उठले. सरसकट गुन्हे मागे घ्या बाकी आम्हाला मान्य नाही. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना