शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

रोहयोच्या कामासाठी शिवसंग्रामचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 01:08 IST

राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शनिवारी रोहिलागड येथील विहिरीत उतरून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शनिवारी रोहिलागड येथील विहिरीत उतरून आंदोलन केले. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. विशेष म्हणजे, २५ ते ३० फूट पाणी असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.जिल्हाभरात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, पाण्याबरोबरच नागरिकांच्या हातालाही काम मिळत नाही. त्यातच सरकारने अद्यापही रोहिलागड परिसरात रोजगार हमी योजनेचे कामे सुरु केली नसल्याने ग्रामस्थांना घरीच बसावे लागत आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ रोहयोची कामे सुरु करावी, दुष्काळाच्या उपाय योजना राबवाव्यात यासह विविध मागण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने शनिवारी विहिरीत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, दुपारी तालुका कृषी अधिकारी डॉ. डी. एस. तारगे, मंडळाधिकारी वैद्य, जमादार शेळके यांनी आंदोलकांची भेट घेतली. याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, अंबड तालुकाध्यक्ष बळीराम शेळके, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब काळवणे, काकासाहेब टकले, अण्णासाहेब टकले, नारायण टकले, विष्णू तार्डे यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळ असून, सरकार कोणत्याही योजना राबवत नाही. त्यामुळे हे आंदोलन केल्याचे शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले म्हणाले.

टॅग्स :agitationआंदोलनgovernment schemeसरकारी योजना