शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

रोहयोच्या कामासाठी शिवसंग्रामचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 01:08 IST

राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शनिवारी रोहिलागड येथील विहिरीत उतरून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शनिवारी रोहिलागड येथील विहिरीत उतरून आंदोलन केले. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. विशेष म्हणजे, २५ ते ३० फूट पाणी असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.जिल्हाभरात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, पाण्याबरोबरच नागरिकांच्या हातालाही काम मिळत नाही. त्यातच सरकारने अद्यापही रोहिलागड परिसरात रोजगार हमी योजनेचे कामे सुरु केली नसल्याने ग्रामस्थांना घरीच बसावे लागत आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ रोहयोची कामे सुरु करावी, दुष्काळाच्या उपाय योजना राबवाव्यात यासह विविध मागण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने शनिवारी विहिरीत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, दुपारी तालुका कृषी अधिकारी डॉ. डी. एस. तारगे, मंडळाधिकारी वैद्य, जमादार शेळके यांनी आंदोलकांची भेट घेतली. याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, अंबड तालुकाध्यक्ष बळीराम शेळके, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब काळवणे, काकासाहेब टकले, अण्णासाहेब टकले, नारायण टकले, विष्णू तार्डे यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळ असून, सरकार कोणत्याही योजना राबवत नाही. त्यामुळे हे आंदोलन केल्याचे शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले म्हणाले.

टॅग्स :agitationआंदोलनgovernment schemeसरकारी योजना