शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

जालना, : घनसावंगी विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात गेली सहा दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची जवळपास सव्वा लाख ...

जालना, : घनसावंगी विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात गेली सहा दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची जवळपास सव्वा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून दोन महिन्यात काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने आधिच मेटाकुटीला आलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ. ॲड. विलास खरात यांनी गुरुवारी केली आहे.

भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना ॲड. विलास खरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ॲड. खरात यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यात सन २०१८ चा पीक विमा अजूनही वाटप झालेला नसून शासनाने याचीही गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे यावेळी त्यांनी नमूद केले. भाजपातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक लेखी निवेदन दिले त्यात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अद्यापही अनेक बँकांनी पूर्ण न केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना तात्काळ कर्जाचे वाटप करण्यात यावे, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे पैसे लाभार्थ्यांना नियमित वेळेत वाटप करण्यात यावेत, या व अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी रामेश्वर पा. भांदरगे, मुरलीधर चौधरी, शिवाजी बोबडे, सुरेश कदम, रामराजे खरात, पांडुरंग उगले, श्रीमंत शेळके, दादा अटकळ, शंकर लहामगे, बालाजी सोळंके, श्रीनिवास उढाण, प्रेमानंद उढाण, बाळासाहेब नाझरकर, अॅड. वैभव कटके, अशोक तारख, शिवाजी शेवाळे, डॉ. किशोर पाखरे, शिवहार कलाने, कांता काकडे, विठ्ठल नांदे, शिवाजी पवार, कृष्णा पवार, राम अटोळे, विलास अटोळे, सुधाकर म्हस्के, एकनाथ गायकवाड, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.