शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

जालना, : घनसावंगी विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात गेली सहा दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची जवळपास सव्वा लाख ...

जालना, : घनसावंगी विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात गेली सहा दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची जवळपास सव्वा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून दोन महिन्यात काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने आधिच मेटाकुटीला आलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ. ॲड. विलास खरात यांनी गुरुवारी केली आहे.

भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना ॲड. विलास खरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ॲड. खरात यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यात सन २०१८ चा पीक विमा अजूनही वाटप झालेला नसून शासनाने याचीही गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे यावेळी त्यांनी नमूद केले. भाजपातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक लेखी निवेदन दिले त्यात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अद्यापही अनेक बँकांनी पूर्ण न केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना तात्काळ कर्जाचे वाटप करण्यात यावे, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे पैसे लाभार्थ्यांना नियमित वेळेत वाटप करण्यात यावेत, या व अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी रामेश्वर पा. भांदरगे, मुरलीधर चौधरी, शिवाजी बोबडे, सुरेश कदम, रामराजे खरात, पांडुरंग उगले, श्रीमंत शेळके, दादा अटकळ, शंकर लहामगे, बालाजी सोळंके, श्रीनिवास उढाण, प्रेमानंद उढाण, बाळासाहेब नाझरकर, अॅड. वैभव कटके, अशोक तारख, शिवाजी शेवाळे, डॉ. किशोर पाखरे, शिवहार कलाने, कांता काकडे, विठ्ठल नांदे, शिवाजी पवार, कृष्णा पवार, राम अटोळे, विलास अटोळे, सुधाकर म्हस्के, एकनाथ गायकवाड, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.