शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

जालना, : घनसावंगी विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात गेली सहा दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची जवळपास सव्वा लाख ...

जालना, : घनसावंगी विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात गेली सहा दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची जवळपास सव्वा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून दोन महिन्यात काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने आधिच मेटाकुटीला आलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ. ॲड. विलास खरात यांनी गुरुवारी केली आहे.

भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना ॲड. विलास खरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ॲड. खरात यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यात सन २०१८ चा पीक विमा अजूनही वाटप झालेला नसून शासनाने याचीही गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे यावेळी त्यांनी नमूद केले. भाजपातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक लेखी निवेदन दिले त्यात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अद्यापही अनेक बँकांनी पूर्ण न केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना तात्काळ कर्जाचे वाटप करण्यात यावे, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे पैसे लाभार्थ्यांना नियमित वेळेत वाटप करण्यात यावेत, या व अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी रामेश्वर पा. भांदरगे, मुरलीधर चौधरी, शिवाजी बोबडे, सुरेश कदम, रामराजे खरात, पांडुरंग उगले, श्रीमंत शेळके, दादा अटकळ, शंकर लहामगे, बालाजी सोळंके, श्रीनिवास उढाण, प्रेमानंद उढाण, बाळासाहेब नाझरकर, अॅड. वैभव कटके, अशोक तारख, शिवाजी शेवाळे, डॉ. किशोर पाखरे, शिवहार कलाने, कांता काकडे, विठ्ठल नांदे, शिवाजी पवार, कृष्णा पवार, राम अटोळे, विलास अटोळे, सुधाकर म्हस्के, एकनाथ गायकवाड, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.