शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
4
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
5
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
6
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
7
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
8
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
10
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
11
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
12
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
13
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
14
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
15
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
16
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
17
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
18
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
19
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
20
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:31 IST

परतीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी आता युध्दपातळीवर पंचनामे करून नुकसानीची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे नुकसानीचा आढाव घेतला.जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीन, मका तसेच फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसनीचा आढावा घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषीसहायक असे तीन कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचा-यांनी आठही तालुक्यातील जवळपास चारशे पेक्षा अधिक गावांना भेटी देवून नुकसानीची माहिती एकत्रित केली आहे. यात प्रामुख्याने कपाशीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. भोकरदन तालुक्यातील धावडा तसेच वालसावंगी आदी गावांमध्ये मकाचे पीकही पूर्णपणे नष्ट झाले आहे. एकीकडे शेतातील पाण्याचा वाफसा होत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. अंतर्गत मशागत करण्यासाठी मजुरांना शेतात पाय ठेवणेही अवघड झाले आहे. अनेक शेतक-यांनी शाळू ज्वारीची पेरणी केली आहे. परंतु, सततच्या पावसामुळे या ज्वारीची वाढ खुंटली असून, शेतात गवत वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पंचनामे सुरु केले आहेत. असे असलेतरी अद्याप शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले नसून यासाठी ८ नोव्हेंबर ही डेडलाईन दिली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.जालना जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांप्रमाणेच परतीच्या पावसाचा डाळींबाच्या बागांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे ७५ टक्क्यापेक्षा अधिक बागाचे नुकसान झाले आहे. आलेला बहार पूर्णपणे नष्ट झाल्याने या भागातील डाळींब बागाचेही तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोमवारी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी तसेच कृषी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी या डाळिंब महासंघाचे राज्यसचिव डॉ. सुयोग कुलकर्णी यांच्यासह अन्य शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीfruitsफळेRevenue Departmentमहसूल विभाग