शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

जिल्ह्यात ४० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:31 IST

परतीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी आता युध्दपातळीवर पंचनामे करून नुकसानीची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे नुकसानीचा आढाव घेतला.जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीन, मका तसेच फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसनीचा आढावा घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषीसहायक असे तीन कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचा-यांनी आठही तालुक्यातील जवळपास चारशे पेक्षा अधिक गावांना भेटी देवून नुकसानीची माहिती एकत्रित केली आहे. यात प्रामुख्याने कपाशीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. भोकरदन तालुक्यातील धावडा तसेच वालसावंगी आदी गावांमध्ये मकाचे पीकही पूर्णपणे नष्ट झाले आहे. एकीकडे शेतातील पाण्याचा वाफसा होत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. अंतर्गत मशागत करण्यासाठी मजुरांना शेतात पाय ठेवणेही अवघड झाले आहे. अनेक शेतक-यांनी शाळू ज्वारीची पेरणी केली आहे. परंतु, सततच्या पावसामुळे या ज्वारीची वाढ खुंटली असून, शेतात गवत वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पंचनामे सुरु केले आहेत. असे असलेतरी अद्याप शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले नसून यासाठी ८ नोव्हेंबर ही डेडलाईन दिली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.जालना जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांप्रमाणेच परतीच्या पावसाचा डाळींबाच्या बागांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे ७५ टक्क्यापेक्षा अधिक बागाचे नुकसान झाले आहे. आलेला बहार पूर्णपणे नष्ट झाल्याने या भागातील डाळींब बागाचेही तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोमवारी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी तसेच कृषी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी या डाळिंब महासंघाचे राज्यसचिव डॉ. सुयोग कुलकर्णी यांच्यासह अन्य शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीfruitsफळेRevenue Departmentमहसूल विभाग