शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

जिल्ह्यात ४० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:31 IST

परतीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी आता युध्दपातळीवर पंचनामे करून नुकसानीची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे नुकसानीचा आढाव घेतला.जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीन, मका तसेच फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसनीचा आढावा घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषीसहायक असे तीन कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचा-यांनी आठही तालुक्यातील जवळपास चारशे पेक्षा अधिक गावांना भेटी देवून नुकसानीची माहिती एकत्रित केली आहे. यात प्रामुख्याने कपाशीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. भोकरदन तालुक्यातील धावडा तसेच वालसावंगी आदी गावांमध्ये मकाचे पीकही पूर्णपणे नष्ट झाले आहे. एकीकडे शेतातील पाण्याचा वाफसा होत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. अंतर्गत मशागत करण्यासाठी मजुरांना शेतात पाय ठेवणेही अवघड झाले आहे. अनेक शेतक-यांनी शाळू ज्वारीची पेरणी केली आहे. परंतु, सततच्या पावसामुळे या ज्वारीची वाढ खुंटली असून, शेतात गवत वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पंचनामे सुरु केले आहेत. असे असलेतरी अद्याप शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले नसून यासाठी ८ नोव्हेंबर ही डेडलाईन दिली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.जालना जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांप्रमाणेच परतीच्या पावसाचा डाळींबाच्या बागांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे ७५ टक्क्यापेक्षा अधिक बागाचे नुकसान झाले आहे. आलेला बहार पूर्णपणे नष्ट झाल्याने या भागातील डाळींब बागाचेही तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोमवारी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी तसेच कृषी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी या डाळिंब महासंघाचे राज्यसचिव डॉ. सुयोग कुलकर्णी यांच्यासह अन्य शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीfruitsफळेRevenue Departmentमहसूल विभाग