शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा

By विजय मुंडे  | Updated: October 28, 2023 13:12 IST

उपोषणकर्त्यांच्या जिवितास धोका झाला तर शासन जबाबदार; उद्यापासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा

अंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा आरक्षणासाठीचा लढा मनोज जरांगे पाटील यांनी आणखी तीव्र केला आहे. महाराष्ट्रातील गावा- गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे रूपांतर उद्यापासून २९ ऑक्टोबर आमरण उपोषणात करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या आमरण उपाेषणात कोणाच्या जिवितास धोका निर्माण झाला तर त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आज आमचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातील गावा- गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे उद्यापासून २९ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणात रूपांतर होणार आहे. शासनाने हे आंदोलन सहज घेवू नये, तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन ३१ ऑक्टोबर पासून सुरू हाेईल. त्याची रूपरेषा ३० ऑक्टोबर रोजी जाहीर करणार आहोत. आमरण उपोषण करताना शांततेत करावे. आपल्या गावात कोणत्या नेत्यांना येवू देवू नका आणि तुम्हीही नेत्यांच्या दारात जावू नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. माझ्या शारीरिक त्रासापेक्षा समाजातील पोरांचा त्रास अधिक आहे. त्यांचे करिअर उद्धवस्त होवू नये यासाठी आपण शारीरिक त्रासाचा विचार न करता टोकाचे उपोषण करीत आहोत. सरकारला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिळतील, अशी अशाही त्यांनी व्यक्त केली.

आमदार, खासदारांनी मुंबई गाठावीदुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात होणारे आंदोलन शासनाला सहज राहणार नाही. त्यामुळे शासनाने हे आंदोलन सहज घेवू नये. सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशन घेवून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना