शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

पेयजल योजनेची कागदपत्रे गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:16 IST

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.तालुक्यातील अंतरवाली सराटी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यासाठी शासनाने ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत स्वतंत्र विहिर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन होती. ही दोन वर्षे झाली तरीही पाण्याच्या टाकीला मुख्य पाईपलाईन जोडल्या गेलीच नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योजनेचा संपूर्ण निधी खर्च करूनही या योजनेचा लाभ जनतेला न होता संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना झालेला दिसतो. यातून शासनाच्या भ्रष्टाचारमुक्त कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गावात लोखंडी व पीव्हीसी पाईपलाईन प्रत्येक गल्लीला स्वतंत्र करण्यात आली. तरीही गावात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही. पाण्याची ओरड कायम आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेल्या पाईपलाईनला विहिरीपासून सगळया गावात गळतीच - गळती होत आहे. पिण्यासाठी सोडलेले पाणी अर्ध्या गावात गळतीमुळे वाया जाते.पाईपलाईन गळतीमुळे मुख्य रस्त्याला गटाराचे स्वरूप प्राप्त होते. पाईपलाईनला लागलेली गळती काढली तर दोन दिवसही ते टीकत नाही, पुन्हा गळती लागते. गळती दुरुस्तीच्या नावाखाली ग्रामपंचायतकडून पैशाची उधळपट्टी होते आहे. परंतु गळती थांबलेली नाही. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे. या योजनेची चौकशी झाल्यास बराच गोंधळ पुढे येऊ शकतो. परंतु हे करणार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजनाWaterपाणी