शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

पेयजल योजनेची कागदपत्रे गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:16 IST

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.तालुक्यातील अंतरवाली सराटी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यासाठी शासनाने ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत स्वतंत्र विहिर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन होती. ही दोन वर्षे झाली तरीही पाण्याच्या टाकीला मुख्य पाईपलाईन जोडल्या गेलीच नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योजनेचा संपूर्ण निधी खर्च करूनही या योजनेचा लाभ जनतेला न होता संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना झालेला दिसतो. यातून शासनाच्या भ्रष्टाचारमुक्त कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गावात लोखंडी व पीव्हीसी पाईपलाईन प्रत्येक गल्लीला स्वतंत्र करण्यात आली. तरीही गावात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही. पाण्याची ओरड कायम आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेल्या पाईपलाईनला विहिरीपासून सगळया गावात गळतीच - गळती होत आहे. पिण्यासाठी सोडलेले पाणी अर्ध्या गावात गळतीमुळे वाया जाते.पाईपलाईन गळतीमुळे मुख्य रस्त्याला गटाराचे स्वरूप प्राप्त होते. पाईपलाईनला लागलेली गळती काढली तर दोन दिवसही ते टीकत नाही, पुन्हा गळती लागते. गळती दुरुस्तीच्या नावाखाली ग्रामपंचायतकडून पैशाची उधळपट्टी होते आहे. परंतु गळती थांबलेली नाही. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे. या योजनेची चौकशी झाल्यास बराच गोंधळ पुढे येऊ शकतो. परंतु हे करणार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजनाWaterपाणी