शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पेयजल योजनेची कागदपत्रे गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:16 IST

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.तालुक्यातील अंतरवाली सराटी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यासाठी शासनाने ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत स्वतंत्र विहिर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन होती. ही दोन वर्षे झाली तरीही पाण्याच्या टाकीला मुख्य पाईपलाईन जोडल्या गेलीच नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योजनेचा संपूर्ण निधी खर्च करूनही या योजनेचा लाभ जनतेला न होता संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना झालेला दिसतो. यातून शासनाच्या भ्रष्टाचारमुक्त कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गावात लोखंडी व पीव्हीसी पाईपलाईन प्रत्येक गल्लीला स्वतंत्र करण्यात आली. तरीही गावात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही. पाण्याची ओरड कायम आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेल्या पाईपलाईनला विहिरीपासून सगळया गावात गळतीच - गळती होत आहे. पिण्यासाठी सोडलेले पाणी अर्ध्या गावात गळतीमुळे वाया जाते.पाईपलाईन गळतीमुळे मुख्य रस्त्याला गटाराचे स्वरूप प्राप्त होते. पाईपलाईनला लागलेली गळती काढली तर दोन दिवसही ते टीकत नाही, पुन्हा गळती लागते. गळती दुरुस्तीच्या नावाखाली ग्रामपंचायतकडून पैशाची उधळपट्टी होते आहे. परंतु गळती थांबलेली नाही. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे. या योजनेची चौकशी झाल्यास बराच गोंधळ पुढे येऊ शकतो. परंतु हे करणार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजनाWaterपाणी