शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

जालन्यात कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:30 IST

जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या जालना-वडीगोद्री मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. असे असले तरी या भागाचे आ. नारायण कुचे यांनी आठवड्यापूर्वीच डागडुजीसाठी १५ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्गाकडून मंजूर झाल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे याचे कामही सुरु झाले आहे. या मार्गाचे काँक्रिटीकरणच करायचे होते तर डागडुजीसाठी कोट्यवधीच्या निधीची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांत संभ्रम : काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटी असताना १५ कोटींची डागडुजी कशाला?

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या जालना-वडीगोद्री मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. असे असले तरी या भागाचे आ. नारायण कुचे यांनी आठवड्यापूर्वीच डागडुजीसाठी १५ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्गाकडून मंजूर झाल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे याचे कामही सुरु झाले आहे. या मार्गाचे काँक्रिटीकरणच करायचे होते तर डागडुजीसाठी कोट्यवधीच्या निधीची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.अनेक वर्षांपासून जालना ते वडीगोद्री हा मार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. या मार्गावर आतापर्यंत २९८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलन करण्यात आले. महिनाभरापूर्वीच अ‍ॅड. किशोर राऊत यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय भीक मांगो आंदोलनही करण्यात आले. यातून संकलित झालेला निधी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री निधीसाठी देण्यात आला आहे. तसेच यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.याचा परिणाम म्हणून गत महिन्यात जालना दौºयावर आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मार्गाच्या सदृढीकरणासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मुंबईत गेल्यानंतर मंजूर करु, असे आश्वासन माध्यमांशी बोलताना दिले होते. हा निधी काही मंजूर झाला नाही.याच्या काही दिवसांपूर्वीच या रस्त्याच्या डागडुजीसाठी ३ कोटींचा निधी आला होता. तोही खर्च झाला. त्यानंतर गत आठवड्यात आ. नारायण कुचे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्यासमवेत या मार्गाची काही ठिकाणी पाहणी केली. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी यावेळी एका अभियंत्यास निलंबितही करण्यात आले.याचवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आपण खा. दानवे यांच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून आणल्याचे आ. कुचे यांनी सांगितले. याचे कामही सुरु झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्याचे साईड पंखे मुरुमाऐवजी मातीने भरले जात आहेत.या कामास प्रारंभ होऊन आठवडा उलटत नाही तोच मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्र शासनाकडून ३३७ कोटी रुपयांचा निधी काँक्रिटीकरणासाठी आणल्याचे जाहीर केले.याची निविदाही काही वृत्तपत्रांत प्रसिद्धही झाली आहे. जालना -वडीगोद्री या मार्गाचे काँक्रिटीरणच करायचे होते, तर मग १५ कोटींचा अपव्यय कशासाठी, असा प्रश्न आता नागरिंकांतून उपस्थित केला जात आहे.केवळ कंत्राटदार पोसण्याचे काम तर शासनाकडून केले जात नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. कधी नव्हे जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला जात आहे. मात्र, याचा विनियोग योग्य पद्धतीने होत नसल्याने सामान्य नागरिकांच्या भरलेल्या कररुपी पैशांतून केवळ ‘खड्डे’ भरणी केली जात आहे.