शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

जाफराबाद तालुक्यातील पाचशे मच्छीमारांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 01:01 IST

धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे मच्छिमार कुटुंबांवरही स्थलांतराची वेळ आली असून, तालुक्यातील जवळपास पाचशे मच्छीमार स्थलांतरित झाले आहे.

प्रकाश मिरगे ।लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तालुक्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे मच्छिमार कुटुंबांवरही स्थलांतराची वेळ आली असून, तालुक्यातील जवळपास पाचशे मच्छीमार स्थलांतरित झाले आहे.तालुक्यातील सातही नद्यांना यावर्षी पाणी न आल्याने जिवरेखा, खडकपूर्णा या सारखी मोठी प्रकल्प कोरडीठाक पडली आहे.जाफराबाद शहरात भोई समाजाची मोठीवस्ती असून, त्यांचा पारंपरिक मच्छीमारीचा व्यवसाय आहे. ऐकाकाळी लहान - मोठे लघु तलाव, पूर्णा, धामणा, केळणा नदीला बारामाही पाणी राहायचे. त्यामुळे व्यवसायही चांगला होयचा. यावर्षी मात्र, पावसाने पाठ फिरवल्यामुळे मच्छिमार अडचणीत सापडले आहे. परिणामी, मच्छिमारी करणाऱ्या कुटुंबावर स्थलांतराची वेळ असून, कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी येथील मच्छिमार पुणे, बारामती, सोलापूर, नगर, उजनी, नाशिक आदी ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी स्थंलातरीत झाले असल्याची माहिती आहे.जाफराबाद तालुक्याला तसा निसर्गाचा कोप गेल्या तीन वर्षापासून जाणवत आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ म्हणायची वेळ आली आहे. परिसरातील वाहून जाणारे पाणी इतर ठिकाणी जात आहेत.या ठिकाणचे मच्छीमार स्थलांतरितपावसाळ््याच्या सुरवातीला व्यवसाय करण्यासाठी मच्छीमारांनी अकोलादेव, कोनड, डोलखेडा, भारज या धरणात मत्स्य बीज सोडले होते. मात्र, पाऊस न आल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. जाफराबाद, कुंभारझरी येथील भोई कुटुंब, त्याचबरोबर मेरखेडा, निमखेडा येथील येथील भिल्ल समाज स्थलांतरित झाला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारwater shortageपाणीटंचाईMigrationस्थलांतरण