शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

३६ कोटी परत गेल्याच्या विषयावरून सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:19 IST

जालना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना शासनाकडून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला आहे. हा निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गेली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना शासनाकडून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला आहे. हा निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गेली. एकीकडे सदस्य कामासाठी निधी मागतात तेव्हा प्रशासन निधी द्याला तयार नसते. आता कोट्यवधी रुपये परत गेले आहे. याचे काय, असा सवाल सदस्यांनी उपस्थित करत सभेत गोंधळ केला.बुधवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, सभापती तौर, सभापती बनसोडे, सभापती घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, वित्त अधिकारी चव्हाण यांच्यासह सर्व सदस्य व अधिका-यांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलाच सदस्यांनी प्रोसेडींग न मिळाल्याच्या मुद्यांवरुन अधिकाºयांना धारे धरले. सदस्य गणेश फुके यांनी सभेची नोटीस व प्रोसेडींग न देणाºया अधिका-याला जवाब विचारला. ते म्हणाले की, मला व काही सदस्यांना सभेची नोटीस व प्रोसेडींग मिळाली नाही. या प्रोसेडींगवर मला अभ्यास करायचा होता. याला जबाबदार अधिकाºयांनी उत्तर द्यावे. लगेचच सदस्य शालीकराम म्हस्के यांनी मलाही प्रोसेंडीग मिळाली नसल्याचे सांगितले. यावरुन सभागृहात गोंधळ उडाला. यानंतर ज्या अधिकाºयानी नोटीसा व प्रोसेडींग पाठवली नाही. त्या अधिकाºयांवर अध्यक्षांनी कारवाई करावी, अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली.अधिकारी हे मनमानी कारभार करीत आहे. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. अध्यक्षांना अधिकाºयांत काय चाललं हेच माहीत नाही. जिल्हा परिषदेत सध्या हुकुमशाही सुरु असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. त्यानंतर राष्ट्रगीताने सभेला सुरुवात करण्यात आली. सुभेच्या सुरुवातीस सदस्य अवधूत खडके यांनी सदस्यांना मिळालेल्या निधीबाबत नाराजी व्यक्त केली.त्यानंतर सदस्य जयमंगल जाधव यांनी परत गेलेल्या निधीचा मुद्दा उचलला. ते म्हणाले की, जालना जिल्हा परिषदेचा सर्वात जास्त निधी परत गेला आहे. यात विशेष म्हणजे, पाणी पुरवठा विभागाचे कोट्यवधी रुपये परत जात आहेत. ज्या जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच जिल्ह्याच्या पाणी पुरवठा विभागाचे कोट्यवधी रुपये परत जात आहेत. याला जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी सर्व सदस्यांनी केली. यानंतर सभेत या मुद्यावर गोंधळ उडाला. या सभेला जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पदाधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती होती.निधीच्या मुद्द्याप्रमाणेच अनेक सदस्यांनी आपापल्या भागातील दुष्काळाचा मुद्दा मांडला. काहींनी पाणीटंचाई संदर्भात प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अध्यक्ष खोतकर यांनी संबंधीत विभागाला गतीने हालचाली करून, पाणीटंचाई आणि दुष्काळाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदfundsनिधीPoliticsराजकारण