शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

मध्यम प्रकल्प जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:12 IST

कडक उन्हामुळे आहे त्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. याचा फटका जलाशयातील पाणी साठ्याला बसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कडक उन्हामुळे आहे त्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. याचा फटका जलाशयातील पाणी साठ्याला बसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.लघु पाटबंधारे विभागाने बांधलेले जिल्ह्यात सात मध्यम तर ५७ लघू प्रकल्प आहेत. यातील एक मध्यम आणि २३ लघू प्रकल्पांची पाणी पातळी ही, जोत्याच्या खाली गेली आहे. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा बहुतांश प्रकल्पांमध्ये थोडेफार का होईना; पाणी शिल्लक आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातील पाणी चोरी करून शेतीला देणाऱ्यांवर कारवाई केल्याने हे पाणी शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. त्यातच जिल्ह्यात विविध ठिकाणी जलयुक्तची कामे झाल्यानेही त्याचा चांगला परिणाम भूगर्भातील पाणीपातळी वाढीस झाल्याचे लघू सिंचन विभागाकडून सांगण्यात आले.लघू प्रकल्पांमध्ये जालना तालुक्यातील वाकी, दरेगाव, जामवाडी, निरखेड तांडा, वानडगाव, कुंभेफळ, बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, भोकरदन तालुक्यातील बरंजळा, प्रल्हादपूर, पिंपळगाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव, रेलगाववाडी. अंबड तालुक्यातील मार्डी, कानडगाव, भातखेडा, धनगर पिंप्री, खडकेश्वर, पानेगाव. घनसावंगी तालुक्यातील मुसा भद्रायणी, जांब समर्थ, मानेपुरी, बोर रांजणी. मंठा तालुक्यातील सारवाडी, वाई या गावांचा समावेश आहे. येत्या मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यात आहे. त्यामुळे पाणीपातळीमध्ये घट होणार असून, आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.मध्यम प्रकल्प : उपयुक्त जलसाठा केवळ २१ टक्क्यांपर्यंतसध्या जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ही २० टक्के असून, ५७ लघू प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा सरासरी २१ टक्के एवढा आहे. सहा पैकी भोकरदन तालुक्यातील धामना हा प्रकल्प जोत्याखाली गेलेला आहे. महिनाभरात यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळ