शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अवकाळी बरसला; अनेक गावांच्या शिवारात गारपीट, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:11 IST

जालना शहरासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद व परिसरातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद व परिसरातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जालना तालुक्यातील कडवंची, अंबड तालुक्यातील शहागड, बदनापूर तालुक्यातील उज्जेनपुरी परिसरात गारपीठ झाल्याने रबी पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे.जालना शहरासह जिल्हाभरात गत काही दिवसांपूर्वीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसात काढून ठेवलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच उभे असलेल्या पिकांचेही वादळी वारे, पावसामुळे नुकसान झाले होते. काही गाव व परिसरातील पिकांच्या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली होती. मात्र, भरपाई मिळेल की नाही ? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.या घटनेला काही दिवस लोटतात न लोटतात तोच मंगळवारी सायंकाळीही वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात हजेरी लावली.जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, वडगाव व परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या गारपिटीत द्राक्ष बागांसह रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सरपंच चंद्रकांत पाटील, नंदापूर येथील नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले.जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, देळेगव्हाण परिसरातही गारपीट झाली. वादळी वा-यामुळे देळेगव्हाण परिसरातील झाडे उन्मळून पडल्याचे शेतकरी समाधान बनकर यांनी सांगितले. तर शेतातील शेडनेटचे जवळपास आठ लाखाचे नुकसान झाल्याचे कृष्णा सांगळे यांनी सांगितले.बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, उज्जैनपुरी, भराडखेडा, कंडारी, अकोला, निकळक, वाल्हा, शेलगावसह परिसरालाही पावसाचा फटका बसला. गारपिटीमुळे गव्हासह काढणीआलेल्या पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. रात्री उशिरापर्यंत शहरासह तालुक्याच्या विविध भागात परिसरातीही वादळी वा-यांसह विजा चमकून पावसाच्या सरी बरसत होत्या.दरम्यान, वादळी वा-यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीज गुल झाली होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.नुकसानभरपाई देण्याची मागणीजालना जिल्ह्यात गत काही दिवसांपूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. या पावसात रबी हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण भागात पुन्हा वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला.या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह द्राक्षबागा, आंबा व इतर फळपिकांना मोठा फटका बसला आहे. झाडे उन्मळून पडल्यानेही नुकसानीचा सामना शेतक-यांना करावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन्ही वेळेस झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी