शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अवकाळी बरसला; अनेक गावांच्या शिवारात गारपीट, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:11 IST

जालना शहरासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद व परिसरातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद व परिसरातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जालना तालुक्यातील कडवंची, अंबड तालुक्यातील शहागड, बदनापूर तालुक्यातील उज्जेनपुरी परिसरात गारपीठ झाल्याने रबी पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे.जालना शहरासह जिल्हाभरात गत काही दिवसांपूर्वीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसात काढून ठेवलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच उभे असलेल्या पिकांचेही वादळी वारे, पावसामुळे नुकसान झाले होते. काही गाव व परिसरातील पिकांच्या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली होती. मात्र, भरपाई मिळेल की नाही ? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.या घटनेला काही दिवस लोटतात न लोटतात तोच मंगळवारी सायंकाळीही वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात हजेरी लावली.जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, वडगाव व परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या गारपिटीत द्राक्ष बागांसह रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सरपंच चंद्रकांत पाटील, नंदापूर येथील नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले.जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, देळेगव्हाण परिसरातही गारपीट झाली. वादळी वा-यामुळे देळेगव्हाण परिसरातील झाडे उन्मळून पडल्याचे शेतकरी समाधान बनकर यांनी सांगितले. तर शेतातील शेडनेटचे जवळपास आठ लाखाचे नुकसान झाल्याचे कृष्णा सांगळे यांनी सांगितले.बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, उज्जैनपुरी, भराडखेडा, कंडारी, अकोला, निकळक, वाल्हा, शेलगावसह परिसरालाही पावसाचा फटका बसला. गारपिटीमुळे गव्हासह काढणीआलेल्या पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. रात्री उशिरापर्यंत शहरासह तालुक्याच्या विविध भागात परिसरातीही वादळी वा-यांसह विजा चमकून पावसाच्या सरी बरसत होत्या.दरम्यान, वादळी वा-यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीज गुल झाली होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.नुकसानभरपाई देण्याची मागणीजालना जिल्ह्यात गत काही दिवसांपूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. या पावसात रबी हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण भागात पुन्हा वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला.या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह द्राक्षबागा, आंबा व इतर फळपिकांना मोठा फटका बसला आहे. झाडे उन्मळून पडल्यानेही नुकसानीचा सामना शेतक-यांना करावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन्ही वेळेस झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी