शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

मातृवंदना योजना; १२ हजार ९४७ महिलांना मिळाला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:38 IST

महिला व बालकांच्या कल्याणाकरिता शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने मातृ वंदना योजना सुरु केली आहे. आरोग्य विभागाने दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेंची प्रभावी अंमलबजावणी केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिला व बालकांच्या कल्याणाकरिता शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने मातृ वंदना योजना सुरु केली आहे. आरोग्य विभागाने दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेंची प्रभावी अंमलबजावणी केली. आठही तालुक्यातील १२ हजार ९४७ लाभार्थ्यांची नोंदणी करुन त्यांना ३ कोटी ७५ लाख रुपयाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.भारत सरकारव्दारे चालविण्यात येणारा एक मातृत्व लाभ कार्यक्रम म्हणून महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने मातृवंदना योजना २०१७ पासून राबविली जात आहे. भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करता समाजातील मोठा घटक मोलमजूरी करुन जगत आहे. घरातील महिला व पुरुष दोघेही मोलमजुरी करतात. परंतु गर्भधारणेच्या अवस्थेत महिलेला काम करताना अडचणी येत असल्यामुळे ती काम करु शकत नाही. त्यामुळे परिवारातील आर्थिक स्थिती खालावते. अशा स्थितीत या परिवाराला मदत मिळावी आणि जन्म आणि बालसंगोपनाला हातभार लागावा याकरिता ही योजना पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहकारिता योजना, या नावाने सुरु करण्यात आली होती. आता ही योजना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या नावाने सुरु आहे. १९ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला या योजनांच्या लाभार्थी असून या योजनेंतर्गत सरकारने ५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गावातील महिलांना मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका प्रयत्नरत आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आर्थिक हातभार लागत आहे.तीन हप्त्यांमध्ये मिळतोच लाभया योजनेचा लाभ तीन हप्त्यांत मिळत असून, या लाभाकरिता लाभार्थ्याचे व त्यांच्या पतीचे अद्ययावत आधारकार्ड हे बँक खात्याशी संलग्न असावे. पहिल्या हप्त्यात १ हजार रुपयांकरिता लाभार्थ्यांना मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसांच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता २ हजार रुपयाचा असून गर्भधारणेपासून सहा महिन्याच्या आत कमीत कमी एक तपासणी केल्यानंतर मिळतो. तिसरा हप्ता २ हजार रुपयांचा असून, यासाठी प्रसुतीनंतर नोंद करणे गरजेचे आहे.१५०२ आशा वर्कर्स करतातय कामयासाठी जिल्हाभरात १ हजार ५०२ आशा वर्कर्स मार्फत ही योजना राबविली जाते. या आशा वर्कर्स प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन योजनेविषयी माहिती देतात. तसेच त्यांच्याकडून तीन फॉर्म भरुन घेतात.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWomenमहिलाfundsनिधीBanking Sectorबँकिंग क्षेत्र