शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठवाडा-विदर्भ सीमेवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; विहिरीत पडल्याने लागला हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:58 IST

मराठवाडा- विदर्भ सीमेवर काळेगाव शिवारात एका शेतातील विहिरीत बिबट्या अचानक पडला.

टेंभुर्णी ( जालना ) : जाफराबाद तालुक्यातील काळेगाव शिवारात एक बिबट्या बुधवारी रात्री विहिरीत पडला. दरम्यान वनविभाग व ग्रामस्थांनी केलेल्या दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. दरम्यान बिबट्या पकडला गेल्याने तूर्त शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असला तरी परिसरात आणखी काही बिबट्यांंचा विहार असावा म्हणून परिसरातील शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मराठवाडा- विदर्भ सीमेवर काळेगाव शिवारात  शेतकरी सुखदेव बनकर यांच्या शेतातील विहिरीत एक नर जातीचा बिबट्या अचानक पडला. गुरुवारी सकाळी शेतातील मोटरपंप सुरू करण्यासाठी सुखदेव बनकर हे शेतात गेले असता त्यांना विहिरीतून डरकाळीचा आवाज आला. त्यांनी विहीरीत डोकावले तर त्यांना  बिबट्या पोहताना दिसला. बनकर यांनी लगेच आजुबाजुंंच्या शेतकऱ्यांना ही वार्ता कळविली.

ही वार्ता गावात कळताच परिसरातील काळेगाव, कुंभारझरी, खल्ल्याळ गव्हाण येथील ग्रामस्थांनी विहिरीवर एकच गर्दी केली. लगेच टेंभुर्णी पोलीसांसह वनविभाग कर्मचाऱ्यांना ही खबर देण्यात आली. टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी हजर झाले. यावेळी त्यांनी तेथील गर्दी नियंत्रणात आणली. बिबट्या पाण्यात बुडून मरू नये म्हणून तोपर्यंत ग्रामस्थांनी दोरीला बांधून एक बाज आत सोडली. पाण्यात पोहून पोहून थकलेला हा बिबट्या क्षणात या बाजेवर आडवा झाला.

यानंतर थोड्याच वेळात जाफराबाद आणि देऊळगावराजा वनविभागाचे कर्मचारी पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पिंजरा विहिरीत सोडून त्यांनी काही तासातच बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात जाताच पिंजऱ्याचा दरवाजा खाली पडला अन् जमलेल्या ग्रामस्थांनी तेथे एकच जल्लोष केला. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जंगलात सोडले जाईल. तुर्त हा बिबट्या विदर्भ वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती जाफराबादच्या वनरक्षक सोनू जाधव यांनी दिली. 

एक महिन्यापासून धुमाकूळदरम्यान मराठवाडा- विदर्भाच्या सीमेवरील खल्ल्याळ गव्हाण आणि काळेगाव शिवारात मागील एक महिन्यापासून या बिबट्याने धुमाकूळ घातला होता. परिसरातील काही वासरांचा त्याने फडशाही पाडल्याने जनतेत प्रचंड घबराट होती. या अगोदर वनविभागाचे कर्मचारी येवूनही गेले पण बिबट्या सापडला नव्हता. आता हा बिबट्या पकडला गेला असला तरी परिसरात आणखी बिबट्यांंचा विहार असावा म्हणून शेतकरी भीती व्यक्त करीत आहे. खडकपुर्णा धरणामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते. सध्या ऊसतोड झाल्याने हे वन्यपशू बाहेर पडले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगलagricultureशेतीJalanaजालना