शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

महिला सक्षम झाल्यासच मराठवाड्याची प्रगती -बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:12 IST

महिलांना आपण केवळ शेतीत गुंतवून न ठेवता त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्यातील जनता ही खूपच संयमी आणि प्रचंड मेहनत करणारी आहे, त्यातले त्यात मराठवाड्यातील पुरूष मंडळी जास्तीच्या राजकारणाात गुंतल्यामुळे शेतीची जास्तीत - जास्त कामे या महिला करत आहे . या महिलांना आपण केवळ शेतीत गुंतवून न ठेवता त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले. ते सोमवारी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित व्हीजन मराठवाडा या कार्यक्रमात बोलत होते.मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव समितीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त व्हीजन मराठवाडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ कृषीभूषण बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आ.विनायक मेटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजेश टोपे, डॉ.संजय लाखे पाटील, अ‍ॅड. दिलीप तौर, अंकुश राउत, शेख महेमूद, सिध्दीविनायक मुळे, बी एम दानवे, गणेश सुपारकर, संतोष गाजरे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.विनायक मेटे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.आ.राजेश टोपे, डॉ. संजय लाखे पाटील, अ‍ॅड. दिलीप तौर, यांनी सविस्तर मते मांडून मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष करण्यासह योजना कशा आणता येतील यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक जगन्नाथ काकडे यांनी केले. अशोक पडूळ यांनी सूत्रसंचालन केले तर अरविंद देशमूख यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत वाढेकर, नरसिंग पवार ,रमेश गजर, दिलीप तळेकर, दत्ता शिंदे, कृष्णा पडूळ, गणेश पडूळ, कचरे, आकात थेंगडे, शुभम टेकाळे, सचिन कचरे, भुतेकर, कृष्णा क्षीरसागर, दिलीप भिसे, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :WomenमहिलाMarathwadaमराठवाडाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा