शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

आग विझवणारी वाळूच जेव्हा पेटते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:33 AM

वाळू उपशामुळे एकूणच मानवी जीवनावर त्याचा कसा विपरित परिणम झाला आहे, याचे वास्तव गोदंी येथील शिक्षक विजय जाधव यांनी पांढरकवड्या या कादंबरीतून मांडले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अचानक आग लागल्यावर ती विझवण्यासाठी पूर्वी वाळूचा उपायोग होत होता. ज्यावेळी कार्बनडाय आॅक्साईडच्या सिलिंडरचा शोध नव्हता, त्यावेळी बसस्थानक, रेल्वेस्थानक अथवा अन्य शासकीय कार्यालयात वाळूने भरलेल्या बादल्या हमखास दिसत. हा आज जरी इतिहास असला तरी, आजची स्थिती उलट झाली आहे, आग विझवणाऱ्या नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे पर्यावरण धोक्यात तर आलेच आहे, परंतु गेल्या दहा वर्षाचा विचार करता, अवैध वाळू उपसा, त्याची वाहतूक यातून अंदाजे शंभर कोटीची हेराफेरी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. वाळू उपशामुळे एकूणच मानवी जीवनावर त्याचा कसा विपरित परिणम झाला आहे, याचे वास्तव गोदंी येथील शिक्षक विजय जाधव यांनी पांढरकवड्या या कादंबरीतून मांडले आहे.अवैध वाळूचा मुद्दा आ. विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत मांडून मोठी खळबळ उडवून दिली. यात गोदावरी नदीपात्राच्या जालना आणि बीड हद्दीतून कशी वाळू उपसली जाते आणि त्यातून अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य संंबंधित कंत्राटदार कसे गब्बर झाले आहेत, याची यादीच सभागृहात झळकवली. आणि त्याची गंभीर दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली. बीड आणि जालन्यातील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली असून, त्याचा अहवाल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वरिष्ठांना सादर केला आहे. त्याचा काय परिणाम होतो ते येत्या आठवडाभरात दिसेल. असे असले तरी, अंकुशनगर येथील छत्रपती हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक विजय जाधव यांनी हा अत्यंत हॉट परंतु तेवढाच गंभीर विषय घेऊन आपलीपांढरकवडा ही कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी त्यांच्या लहानपणीची गोंदी, कुरणसह अन्य गावांमध्ये असलेली नदीपात्रातील संपन्नता दर्शवली आहे. वाळू पात्रात पूर्वी क्रिकेट खेळतांना हाताने अर्धा फूट खड्ड केल्यावर लगेच पाण्याचा झरा लागायचा आणि त्यातील नितळ पाणी पिऊन सर्व बच्चे कंपनी आपली तहान भागवत असत. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात या नदीपत्रातून अक्षरश: जेसीबी, पोकलेनने वाळू ओरबडून घेतली आहे. या वाळूच्या व्यवसायाने अनेक तरूणांना व्यसनाधीन केले आहे. केवळ अधिका-यांची टीप देणा-यास ५०० रूपये मिळतात. तसेच गावांमध्ये कधीच एवढे ट्रॅक्टर, ट्रक, हायवा दिसत नव्हत्या, त्यांचा तर आज सुळसूळाट झाला आहे. गोदापत्राची संपन्नताच नष्ट झाली आहे. याला ज्या प्रमाणे येथील प्रशासन जबाबदार आहे, त्याच प्रमाणे तेथील नागरिकही तेवढेच जबादार म्हणावे लागतील. अवैध वाळूचा उपसा करणा-यांना आपल्या शेतातून रस्ता करून देण्यासह वाळू माफियांना मिळणारी गावकºयांची अप्रत्यक्ष साथ हा देखील एक गंभीर विषय समोर आला आहे.कादंबरीचा एमए. च्या अभ्यासक्रमात समावेशविजय जाधव यांनी २४८ पानांची लिहिलेल्या या पांढरकवड्या कादंबरीची दखल नांदेड येथील स्वराती विद्यापीठाने घेतली असून, एमए च्या व्दितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. जाधव यांनी यापूर्वीही शेतक-यांच्या व्यथा मांडणारी दाखला ही कादंबरी लिहिली असून,त्यांना बाबूराव बागूल यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे. साने गुरूजी या पुस्तकाचे जाधव यांनी इंग्रजीत भाषांतर केले.

टॅग्स :literatureसाहित्यsandवाळूSmugglingतस्करी