शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

आग विझवणारी वाळूच जेव्हा पेटते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:34 IST

वाळू उपशामुळे एकूणच मानवी जीवनावर त्याचा कसा विपरित परिणम झाला आहे, याचे वास्तव गोदंी येथील शिक्षक विजय जाधव यांनी पांढरकवड्या या कादंबरीतून मांडले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अचानक आग लागल्यावर ती विझवण्यासाठी पूर्वी वाळूचा उपायोग होत होता. ज्यावेळी कार्बनडाय आॅक्साईडच्या सिलिंडरचा शोध नव्हता, त्यावेळी बसस्थानक, रेल्वेस्थानक अथवा अन्य शासकीय कार्यालयात वाळूने भरलेल्या बादल्या हमखास दिसत. हा आज जरी इतिहास असला तरी, आजची स्थिती उलट झाली आहे, आग विझवणाऱ्या नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे पर्यावरण धोक्यात तर आलेच आहे, परंतु गेल्या दहा वर्षाचा विचार करता, अवैध वाळू उपसा, त्याची वाहतूक यातून अंदाजे शंभर कोटीची हेराफेरी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. वाळू उपशामुळे एकूणच मानवी जीवनावर त्याचा कसा विपरित परिणम झाला आहे, याचे वास्तव गोदंी येथील शिक्षक विजय जाधव यांनी पांढरकवड्या या कादंबरीतून मांडले आहे.अवैध वाळूचा मुद्दा आ. विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत मांडून मोठी खळबळ उडवून दिली. यात गोदावरी नदीपात्राच्या जालना आणि बीड हद्दीतून कशी वाळू उपसली जाते आणि त्यातून अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य संंबंधित कंत्राटदार कसे गब्बर झाले आहेत, याची यादीच सभागृहात झळकवली. आणि त्याची गंभीर दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली. बीड आणि जालन्यातील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली असून, त्याचा अहवाल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वरिष्ठांना सादर केला आहे. त्याचा काय परिणाम होतो ते येत्या आठवडाभरात दिसेल. असे असले तरी, अंकुशनगर येथील छत्रपती हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक विजय जाधव यांनी हा अत्यंत हॉट परंतु तेवढाच गंभीर विषय घेऊन आपलीपांढरकवडा ही कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी त्यांच्या लहानपणीची गोंदी, कुरणसह अन्य गावांमध्ये असलेली नदीपात्रातील संपन्नता दर्शवली आहे. वाळू पात्रात पूर्वी क्रिकेट खेळतांना हाताने अर्धा फूट खड्ड केल्यावर लगेच पाण्याचा झरा लागायचा आणि त्यातील नितळ पाणी पिऊन सर्व बच्चे कंपनी आपली तहान भागवत असत. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात या नदीपत्रातून अक्षरश: जेसीबी, पोकलेनने वाळू ओरबडून घेतली आहे. या वाळूच्या व्यवसायाने अनेक तरूणांना व्यसनाधीन केले आहे. केवळ अधिका-यांची टीप देणा-यास ५०० रूपये मिळतात. तसेच गावांमध्ये कधीच एवढे ट्रॅक्टर, ट्रक, हायवा दिसत नव्हत्या, त्यांचा तर आज सुळसूळाट झाला आहे. गोदापत्राची संपन्नताच नष्ट झाली आहे. याला ज्या प्रमाणे येथील प्रशासन जबाबदार आहे, त्याच प्रमाणे तेथील नागरिकही तेवढेच जबादार म्हणावे लागतील. अवैध वाळूचा उपसा करणा-यांना आपल्या शेतातून रस्ता करून देण्यासह वाळू माफियांना मिळणारी गावकºयांची अप्रत्यक्ष साथ हा देखील एक गंभीर विषय समोर आला आहे.कादंबरीचा एमए. च्या अभ्यासक्रमात समावेशविजय जाधव यांनी २४८ पानांची लिहिलेल्या या पांढरकवड्या कादंबरीची दखल नांदेड येथील स्वराती विद्यापीठाने घेतली असून, एमए च्या व्दितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. जाधव यांनी यापूर्वीही शेतक-यांच्या व्यथा मांडणारी दाखला ही कादंबरी लिहिली असून,त्यांना बाबूराव बागूल यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे. साने गुरूजी या पुस्तकाचे जाधव यांनी इंग्रजीत भाषांतर केले.

टॅग्स :literatureसाहित्यsandवाळूSmugglingतस्करी