शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

आग विझवणारी वाळूच जेव्हा पेटते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:34 IST

वाळू उपशामुळे एकूणच मानवी जीवनावर त्याचा कसा विपरित परिणम झाला आहे, याचे वास्तव गोदंी येथील शिक्षक विजय जाधव यांनी पांढरकवड्या या कादंबरीतून मांडले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अचानक आग लागल्यावर ती विझवण्यासाठी पूर्वी वाळूचा उपायोग होत होता. ज्यावेळी कार्बनडाय आॅक्साईडच्या सिलिंडरचा शोध नव्हता, त्यावेळी बसस्थानक, रेल्वेस्थानक अथवा अन्य शासकीय कार्यालयात वाळूने भरलेल्या बादल्या हमखास दिसत. हा आज जरी इतिहास असला तरी, आजची स्थिती उलट झाली आहे, आग विझवणाऱ्या नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे पर्यावरण धोक्यात तर आलेच आहे, परंतु गेल्या दहा वर्षाचा विचार करता, अवैध वाळू उपसा, त्याची वाहतूक यातून अंदाजे शंभर कोटीची हेराफेरी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. वाळू उपशामुळे एकूणच मानवी जीवनावर त्याचा कसा विपरित परिणम झाला आहे, याचे वास्तव गोदंी येथील शिक्षक विजय जाधव यांनी पांढरकवड्या या कादंबरीतून मांडले आहे.अवैध वाळूचा मुद्दा आ. विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत मांडून मोठी खळबळ उडवून दिली. यात गोदावरी नदीपात्राच्या जालना आणि बीड हद्दीतून कशी वाळू उपसली जाते आणि त्यातून अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य संंबंधित कंत्राटदार कसे गब्बर झाले आहेत, याची यादीच सभागृहात झळकवली. आणि त्याची गंभीर दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली. बीड आणि जालन्यातील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली असून, त्याचा अहवाल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वरिष्ठांना सादर केला आहे. त्याचा काय परिणाम होतो ते येत्या आठवडाभरात दिसेल. असे असले तरी, अंकुशनगर येथील छत्रपती हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक विजय जाधव यांनी हा अत्यंत हॉट परंतु तेवढाच गंभीर विषय घेऊन आपलीपांढरकवडा ही कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी त्यांच्या लहानपणीची गोंदी, कुरणसह अन्य गावांमध्ये असलेली नदीपात्रातील संपन्नता दर्शवली आहे. वाळू पात्रात पूर्वी क्रिकेट खेळतांना हाताने अर्धा फूट खड्ड केल्यावर लगेच पाण्याचा झरा लागायचा आणि त्यातील नितळ पाणी पिऊन सर्व बच्चे कंपनी आपली तहान भागवत असत. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात या नदीपत्रातून अक्षरश: जेसीबी, पोकलेनने वाळू ओरबडून घेतली आहे. या वाळूच्या व्यवसायाने अनेक तरूणांना व्यसनाधीन केले आहे. केवळ अधिका-यांची टीप देणा-यास ५०० रूपये मिळतात. तसेच गावांमध्ये कधीच एवढे ट्रॅक्टर, ट्रक, हायवा दिसत नव्हत्या, त्यांचा तर आज सुळसूळाट झाला आहे. गोदापत्राची संपन्नताच नष्ट झाली आहे. याला ज्या प्रमाणे येथील प्रशासन जबाबदार आहे, त्याच प्रमाणे तेथील नागरिकही तेवढेच जबादार म्हणावे लागतील. अवैध वाळूचा उपसा करणा-यांना आपल्या शेतातून रस्ता करून देण्यासह वाळू माफियांना मिळणारी गावकºयांची अप्रत्यक्ष साथ हा देखील एक गंभीर विषय समोर आला आहे.कादंबरीचा एमए. च्या अभ्यासक्रमात समावेशविजय जाधव यांनी २४८ पानांची लिहिलेल्या या पांढरकवड्या कादंबरीची दखल नांदेड येथील स्वराती विद्यापीठाने घेतली असून, एमए च्या व्दितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. जाधव यांनी यापूर्वीही शेतक-यांच्या व्यथा मांडणारी दाखला ही कादंबरी लिहिली असून,त्यांना बाबूराव बागूल यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे. साने गुरूजी या पुस्तकाचे जाधव यांनी इंग्रजीत भाषांतर केले.

टॅग्स :literatureसाहित्यsandवाळूSmugglingतस्करी