शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठ्यांना वेगळे आरक्षण नकोच, ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 12:22 IST

सग्या -सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ओबीसीतून आरक्षण कधी देणार हे सांगा ?

जालनामराठा समाजास शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यात वेगळे १० टक्के आरक्षण देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीस राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. मात्र, वेगळे आरक्षण आम्हाला नकोच. हक्काचे ओबोसी आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. सग्या -सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ओबीसीतून आरक्षण कधी देणार हे सांगा ? असा सवाल जरांगे यांनी सरकारला केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलं आहे. तत्पूर्वी राज्यातील मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार, राज्यात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.  यावर जरांगे यांनी आक्षेप घेतला आहे. जरांगे म्हणाले, सरकार देत आहे ते आरक्षण आम्ही मागितले नाही. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ज्यांचा सातबारा नाही त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे. हे होत नसेल तर सरकारने अधिवेशन कशासाठी बोलावले आहे. सरकारने वेगळे १० टक्के आरक्षण देऊन आमची फसवणूक केली आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. आम्ही सरकारला भरपूर वेळ दिला आहे. आता लढल्याशिवाय न्याय नाही मिळणार. सगेसोयरे याची अंमलबजावणी कशी होत नाही हे पाहतोच, असा इशारा देखील जरांगे यांनी यावेळी दिला. 

उद्या आंदोलनाची दिशा ठरणार अधिवेशनात सगे-सोयरे यावर चर्चा होते का ते पाहणार आहोत. सायंकाळपर्यंत आम्ही वाट पाहणार असून सकारात्मक काही घडले नाही तर उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार, अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे.

काय आहे आयोगाच्या अहवालात मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागास असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात म्हटले आहे. मराठा समाज हा राज्यभरात २८ टक्के असल्याचे न्या. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आढळून आले. सुमारे ५२ टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट  आधीच राखीव प्रवर्गात आहे. त्यामुळे राज्यातील २८ टक्के असलेल्या अशा मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल, असे आयोगाच्या अहवालात असल्याच्या माहिती आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाState Governmentराज्य सरकार