शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

शासनाला 2 महिन्यांचा वेळ, दगाफटका झाल्यास आर्थिक नाड्या आवळणार; जरांगे पाटलांचा इशारा

By विजय मुंडे  | Updated: November 2, 2023 20:31 IST

साखळी उपोषण सुरूच राहणार, आत्महत्या करू नका

- विजय मुंडे

जालना / वडीगोद्री : मराठवाड्याचे आज भागले असते, परंतु सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ही लढाई सुरू आहे. ही मोठी लढाई आहे आणि जिंकायची आहे. आरक्षण कायद्यात टिकले पाहिजे. यासाठी शासनाला दोन महिन्यांचा वेळ देवू. आता दगाफटका झाला तर यांच्या सर्व नाड्या आवळण्यासाठी मुंबईच्या बाहेर कोट्यवधी मराठे बसतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या नवव्या दिवशी बुधवारी निवृत्त न्यायमूर्तींसह शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.

मराठवाड्यात १३ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होते. परंतु, आम्हाला ते मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समिती राज्यभरात काम करावे, मराठवाडा आणि राज्याचा डाटा मिळून समितीने दोन महिन्यात अहवाल द्यायचा आणि त्याच्याआधारे सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी. सख्या परिवारातील लोकांना, सख्खे रक्ताचे नातेावाईक, रक्ताचे सर्व सोयरे आणि राज्यातील मागेल त्या गरजवंत मराठ्यांना त्याच अहवालाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे. अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

राज्य मगासवर्ग आयोग, शिंदे समिती, सल्लागार समितीला कम करायचे आहे. मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिने देवू. दोन महिन्यात दगाफटका झाला तर मुंबईच्या नाड्या बंद करू. यांना घराच्याबाहेर पडता आले नाही पाहिजे, असे तीव्र आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला.यांनी केली जरांगे पाटील यांच्याशी चर्चा

मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, आ. बच्चू कडू, नारायण कुचे, मंगेश चिवटे, निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड, निवृत्त न्यायाधीश सुनील सुक्रे, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी यशस्वी चर्चा केली.

बच्चू कडू यांची शिष्टाई आली कामीमाजी मंत्री आ. बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी मंगळवारी रात्री चर्चा केली होती. त्यानंतर आज निवृत्त न्यायमूर्ती व शासनाचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे आले. सोबत आ. बच्चू कडू हे ही होते. या आंदोलनादरम्यान आ.कडू यांनी केलेली शिष्टाई कामी आली आणि जरांगे पाटील व मराठा समाजाने शासनाला दोन महिन्यांचा वेळ दिला.

साखळी उपोषण सुरूच राहणार, आत्महत्या करू नकाआजपासून आमरण उपोषण बंद करा. साखळी उपोषण सुरू ठेवा. उग्र आंदोलन करू नका. कोणीही आत्महत्या करू नका. पुढील लढाईची तयारी माझ्यासोबत करा. पुढे मोठा लढा लढायचा आहे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.महाराष्ट्रातील गुन्हे मागे घ्या

महाराष्ट्रात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. अंतरवालीतील गुन्हे १५ दिवसांत मागे घेणार आणि उर्वरित गुन्हे एका महिन्यात मागे घेणार असा शब्द शिष्टमंडळाने दिल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना