शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शासनाला 2 महिन्यांचा वेळ, दगाफटका झाल्यास आर्थिक नाड्या आवळणार; जरांगे पाटलांचा इशारा

By विजय मुंडे  | Updated: November 2, 2023 20:31 IST

साखळी उपोषण सुरूच राहणार, आत्महत्या करू नका

- विजय मुंडे

जालना / वडीगोद्री : मराठवाड्याचे आज भागले असते, परंतु सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ही लढाई सुरू आहे. ही मोठी लढाई आहे आणि जिंकायची आहे. आरक्षण कायद्यात टिकले पाहिजे. यासाठी शासनाला दोन महिन्यांचा वेळ देवू. आता दगाफटका झाला तर यांच्या सर्व नाड्या आवळण्यासाठी मुंबईच्या बाहेर कोट्यवधी मराठे बसतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या नवव्या दिवशी बुधवारी निवृत्त न्यायमूर्तींसह शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.

मराठवाड्यात १३ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होते. परंतु, आम्हाला ते मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समिती राज्यभरात काम करावे, मराठवाडा आणि राज्याचा डाटा मिळून समितीने दोन महिन्यात अहवाल द्यायचा आणि त्याच्याआधारे सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी. सख्या परिवारातील लोकांना, सख्खे रक्ताचे नातेावाईक, रक्ताचे सर्व सोयरे आणि राज्यातील मागेल त्या गरजवंत मराठ्यांना त्याच अहवालाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे. अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

राज्य मगासवर्ग आयोग, शिंदे समिती, सल्लागार समितीला कम करायचे आहे. मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिने देवू. दोन महिन्यात दगाफटका झाला तर मुंबईच्या नाड्या बंद करू. यांना घराच्याबाहेर पडता आले नाही पाहिजे, असे तीव्र आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला.यांनी केली जरांगे पाटील यांच्याशी चर्चा

मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, आ. बच्चू कडू, नारायण कुचे, मंगेश चिवटे, निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड, निवृत्त न्यायाधीश सुनील सुक्रे, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी यशस्वी चर्चा केली.

बच्चू कडू यांची शिष्टाई आली कामीमाजी मंत्री आ. बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी मंगळवारी रात्री चर्चा केली होती. त्यानंतर आज निवृत्त न्यायमूर्ती व शासनाचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे आले. सोबत आ. बच्चू कडू हे ही होते. या आंदोलनादरम्यान आ.कडू यांनी केलेली शिष्टाई कामी आली आणि जरांगे पाटील व मराठा समाजाने शासनाला दोन महिन्यांचा वेळ दिला.

साखळी उपोषण सुरूच राहणार, आत्महत्या करू नकाआजपासून आमरण उपोषण बंद करा. साखळी उपोषण सुरू ठेवा. उग्र आंदोलन करू नका. कोणीही आत्महत्या करू नका. पुढील लढाईची तयारी माझ्यासोबत करा. पुढे मोठा लढा लढायचा आहे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.महाराष्ट्रातील गुन्हे मागे घ्या

महाराष्ट्रात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. अंतरवालीतील गुन्हे १५ दिवसांत मागे घेणार आणि उर्वरित गुन्हे एका महिन्यात मागे घेणार असा शब्द शिष्टमंडळाने दिल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना