शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळे सत्तेचा लाडू आपल्याकडे येईल या भ्रमात कोणी राहू नये : हर्षवर्धन जाधव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:08 IST

मराठा आंदोलनामुळे आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू येईल अशा भ्रमात कोणी राहू नये असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला. 

जालना : आताचे सरकार ही आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे. मराठा आंदोलनाचा फटका भाजपाला बसणारच आहे. मात्र, त्यामुळे आपोआपच आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू येईल अशा भ्रमात कोणी राहू नये असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला. 

आज जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी आजचे सरकार हे आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे, हे जरी मान्य असले तरी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्षे सत्तेत असताना आरक्षणा संदर्भात काहीही केले नसल्याची टीकाही  केली. पत्रकार परिषदेस संजय लाखे पाटील, भास्कर दानवे, विष्णू पाचफुले, जगन्नाथ काकडे, प्रशांत वाढेकर, राजेंद्र गोरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

अध्यादेश काढावा सरकार आरक्षणाबाबत दिशाभूल करत असल्याचे सांगून, न्यायालय आणि मागास आयोगाकडे बोट दाखवत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढून समाजाला दिलासा देण्याचे काम करावे. याचा समावेश नंतर घटनेच्या परिष्ठ ९ मध्ये करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यालयात रद्द होणार नाही अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी केली.

मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष असावा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला आहे. असे असताना राजकीय पक्ष हे सोयीची भूमिका घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यासाठी आता मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढून आरक्षण मिळविण्यासाठी दबाव टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन