शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळे सत्तेचा लाडू आपल्याकडे येईल या भ्रमात कोणी राहू नये : हर्षवर्धन जाधव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:08 IST

मराठा आंदोलनामुळे आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू येईल अशा भ्रमात कोणी राहू नये असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला. 

जालना : आताचे सरकार ही आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे. मराठा आंदोलनाचा फटका भाजपाला बसणारच आहे. मात्र, त्यामुळे आपोआपच आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू येईल अशा भ्रमात कोणी राहू नये असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला. 

आज जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी आजचे सरकार हे आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे, हे जरी मान्य असले तरी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्षे सत्तेत असताना आरक्षणा संदर्भात काहीही केले नसल्याची टीकाही  केली. पत्रकार परिषदेस संजय लाखे पाटील, भास्कर दानवे, विष्णू पाचफुले, जगन्नाथ काकडे, प्रशांत वाढेकर, राजेंद्र गोरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

अध्यादेश काढावा सरकार आरक्षणाबाबत दिशाभूल करत असल्याचे सांगून, न्यायालय आणि मागास आयोगाकडे बोट दाखवत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढून समाजाला दिलासा देण्याचे काम करावे. याचा समावेश नंतर घटनेच्या परिष्ठ ९ मध्ये करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यालयात रद्द होणार नाही अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी केली.

मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष असावा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला आहे. असे असताना राजकीय पक्ष हे सोयीची भूमिका घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यासाठी आता मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढून आरक्षण मिळविण्यासाठी दबाव टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन