शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मनोज जरांगे यांना मध्यरात्री सलाईन लावले; "सरकारचा विषय तडीस नेण्याचा शब्द, अन्यथा..." 

By विजय मुंडे  | Updated: June 12, 2024 12:35 IST

मराठा आरक्षणाचा विषय तडीस न नेल्यास सलाईन पुन्हा काढून टाकेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे

वडीगोद्री ( जालना) : ''सरकारकडून सांगण्यात आले विषय तडीस नेतो, म्हणून सलाईन लावले त्यांनी तडीस न नेल्यास सलाईन पुन्हा काढून टाकेल. विषय तडीस गेल्याशिवाय मी मागे हटणार नाही. '', असा इशारा बेमुदत उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करत आहेत. मंगळवारी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आले. आज सकाळपर्यंत ४ सलाईन संपल्या आहेत. 

दरम्यान, मध्यरात्री बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांच्यासोबत बातचीत केली. यावर जरांगे म्हणाले, ते निरोप घेऊन आले होते. तो कोणत्याही पक्षाचा आमदार असो, मला त्याच्याशी घेणंदेणं नाही. मात्र, मदतीसाठी ते प्रयत्न करत आहेत. चर्चा तर घडून आलीच पाहिजे. सरकारने त्यांच्यामार्फत सांगितले आहे की, आम्ही ताबडतोब विषय तडीस काढू. फक्त सलाईन लावून घ्यावी. सरकारच्या शब्दाला मान देऊन सलाईन घेतले. त्यांनी विषय तडीस नेला नाही तर पुन्हा सलाईन काढू, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. 

आज शिष्टमंडळ भेटणार 'सगेसोयरे'च्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत. अंमलबजावणी करायची असल्यास एवढा वेळ थोडाच लागतो. आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे, नाही कळलं तर सलाईन काढून टाकू. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक नाही. मी समाजासाठी मरेपर्यंत लढणार असल्याचेही जरांगे म्हणाले. तसेच आज दुपारी सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीस येणार असल्याची माहिती आहे. 

छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका''त्याला काही कळत नाही, ते कामातून गेलेले. एवढा ओबीसी अडचणीत आला असता का? बधीर आहे तो'', असा हल्ला जरांगे यांनी मंत्री भुजबळ यांचेवर चढवला. तसेच लक्ष्मण हाके अंतरवाली सराटी येथे उपोषण करणार असल्याची माहिती आहे. ''कुठून पण उपोषण कर, मी आणि माझा समाज किंमत देत नाही'', अशी भूमिका हाके यांच्यावर जरांगे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील