शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पीकविमा कंपन्यांचा कारभार म्हणजे 'मटका'; पालकमंत्री लोणीकर यांनी विमा कंपन्यांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:57 IST

मोजक्या पिकांवरच मिळतेय भरपाई

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात पिकविम्यासाठी शेतकऱ्यांनी चारशे कोटी रूपये भरलेविमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान झाले

- संजय देशमुख 

जालना : पीकविमा कंपन्या म्हणजे एकेकाळचा मटका किंग म्हणून प्रसिध्द असलेल्या रतन खत्री पेक्षाही भारी आहेत, खत्री ज्या प्रमाणे मटक्यावर ज्या आकड्यावर जास्त पैसे लावले आहेत, तो आकडा काढत नसे. त्याच धर्तीवर  पीकविमा कंपन्यांचा कारभार असल्याचा सनसनाटी आरोप पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली.

पाणीपुरवठा मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी पिकविम्याबाबत जाब विचारला. यावेळी विमा कंपनीचा प्रतिनिधी या बैठकीस हजर होता. त्याला उठवून तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करित आहात. शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टाचा पैसा तुमच्याकडे मोठ्या आशेने गुंतवला आहे. परंतु काही मोजक्या पिकांनाचा हा नुकसान भरपाईचा लाभ देऊन विमा कंपन्यांनी हात वर केले आहेत. ही बाब गंभीर असून, ज्यांनी विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान झाले असेल तर भरपाई मिळालीच पाहिजे. तुम्ही तर रतन खत्री पेक्षाही भारी निघालात असे सांगून बैठकीत हशा पिकवून दिला. मात्र, हा मुद्दा हसण्यावर नेण्याचा नसल्याचे सांगून त्यांनी विमा कंपनीला एक प्रकारे सज्जड दमच भरला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी दानवे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एकूणच कारभारावर नाराजी व्यक्त करत तुमचे जेवढे वय आहे, तेवढा माझा राजकीय अनुभव असल्याचे सांगून प्रशासनातील त्रुटींवर गंभीर बोट ठेवले. तसेच जि.प.चे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी पाझर तलवासाठी संपादित केलेल्या मावेजाची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्या हेडखाली वळवल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले.  

शेतकऱ्यांनी चारशे कोटी रूपये भरलेजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढण्यासाठी या विमा कंपन्यांकडे चारशे कोटी रूपयांपेक्षा अधिकचा विमा हप्ता भरला आहे. त्यामुळे त्यांनी चांगला परतावा मिळेल अशी आशा होती, मात्र, ती फोल ठरल्याने बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

बैठकीस यांची उपस्थिती बैठकीस परभणीचे खासदार संजय जाधव, आ.नारायण कुचे, आ. संतोष दानवे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरagricultureशेती