शहरं
Join us  
Trending Stories
1
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
2
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
3
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
5
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
7
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
8
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
9
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
10
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
11
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
12
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
13
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
14
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
15
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
16
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
17
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
20
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल

पीकविमा कंपन्यांचा कारभार म्हणजे 'मटका'; पालकमंत्री लोणीकर यांनी विमा कंपन्यांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:57 IST

मोजक्या पिकांवरच मिळतेय भरपाई

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात पिकविम्यासाठी शेतकऱ्यांनी चारशे कोटी रूपये भरलेविमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान झाले

- संजय देशमुख 

जालना : पीकविमा कंपन्या म्हणजे एकेकाळचा मटका किंग म्हणून प्रसिध्द असलेल्या रतन खत्री पेक्षाही भारी आहेत, खत्री ज्या प्रमाणे मटक्यावर ज्या आकड्यावर जास्त पैसे लावले आहेत, तो आकडा काढत नसे. त्याच धर्तीवर  पीकविमा कंपन्यांचा कारभार असल्याचा सनसनाटी आरोप पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली.

पाणीपुरवठा मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी पिकविम्याबाबत जाब विचारला. यावेळी विमा कंपनीचा प्रतिनिधी या बैठकीस हजर होता. त्याला उठवून तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करित आहात. शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टाचा पैसा तुमच्याकडे मोठ्या आशेने गुंतवला आहे. परंतु काही मोजक्या पिकांनाचा हा नुकसान भरपाईचा लाभ देऊन विमा कंपन्यांनी हात वर केले आहेत. ही बाब गंभीर असून, ज्यांनी विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान झाले असेल तर भरपाई मिळालीच पाहिजे. तुम्ही तर रतन खत्री पेक्षाही भारी निघालात असे सांगून बैठकीत हशा पिकवून दिला. मात्र, हा मुद्दा हसण्यावर नेण्याचा नसल्याचे सांगून त्यांनी विमा कंपनीला एक प्रकारे सज्जड दमच भरला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी दानवे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एकूणच कारभारावर नाराजी व्यक्त करत तुमचे जेवढे वय आहे, तेवढा माझा राजकीय अनुभव असल्याचे सांगून प्रशासनातील त्रुटींवर गंभीर बोट ठेवले. तसेच जि.प.चे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी पाझर तलवासाठी संपादित केलेल्या मावेजाची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्या हेडखाली वळवल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले.  

शेतकऱ्यांनी चारशे कोटी रूपये भरलेजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढण्यासाठी या विमा कंपन्यांकडे चारशे कोटी रूपयांपेक्षा अधिकचा विमा हप्ता भरला आहे. त्यामुळे त्यांनी चांगला परतावा मिळेल अशी आशा होती, मात्र, ती फोल ठरल्याने बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

बैठकीस यांची उपस्थिती बैठकीस परभणीचे खासदार संजय जाधव, आ.नारायण कुचे, आ. संतोष दानवे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरagricultureशेती