शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

जालन्यातील कुपोषण रिहॅबिलिटेशन सेंटरचा राज्यात टॉप टेनमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:18 IST

जालन्यातील कुपोषण निर्मूलनासाठी येथील शासकीय रुग्णालयात २०१५ मध्ये सुरू केलेले एनआरसी सेंटर अर्थात न्यूट्रीशियन रिहॅबिलिटेशन सेंटरने राज्यात अव्वल भरारी घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील कुपोषण निर्मूलनासाठी येथील शासकीय रुग्णालयात २०१५ मध्ये सुरू केलेले एनआरसी सेंटर अर्थात न्यूट्रीशियन रिहॅबिलिटेशन सेंटरने राज्यात अव्वल भरारी घेतली आहे. राज्यातील पहिल्या दहा केंद्रांमध्ये जालन्यातील या केंद्राचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर आणि त्या केंद्रातील आहारतज्ज्ञ तसे परि चारिकांचे परिश्रम यामुळेच हे शक्य झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.जालना जिल्हा हा शिक्षणा सोबतच आरोग्याबाबतही दुर्लक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे कुपोषणाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या कुपोषित बालकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर त्यांचे पुढचे जगणे सुकर होईल असे अति कुपोषित मुला-मुलींचा शोध अंगणवाडी ताईकडून घेतला जातो.ज्यांचे वजन हे अत्यंत कमी असेल आणि त्यांच्या दंडाचा घेर हा ११.५ सेमी. पेक्षा कमी असेल, अशांना लगेचच जालन्यातील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले जाते. येथे अशा मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष येथे २१०५ मध्ये सुरू झाला आहे. आता पर्यंत या चार वर्षात साधारपणे अतिकुपोषित जवळपास ५०० पेक्षा अधिक मुलांवर येथे यशस्वी उपचार करून त्यांना ठणठणीत करण्यात आल्याची माहिती या केंद्राचे बालरोगतज्ज्ञ सुरजित अंभुरे आणि डॉ. भारती आंधळे यांनी दिली.जालन्यातील या केंद्रात जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील कुपोषित बालकांवर उपचार केले जातात. या केंद्रात बालाकांसोबतच त्यांच्या आईला पोषण आहार देण्यात येतो. साधारणपणे किमान १५ दिवस या मुलांना त्यांच्या आईसह आरोग्यदायी आणि विविध जीवनसत्व असलेल्या आहाराचा पुरवठा करून मुलांचे वजन वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. विशेष म्हणजे आईला शंभर रूपये रोज या प्रमाणे भत्ताही दिला जातो. कुपोषणाचे प्रमाण नेमके कशामुळे वाढते, या बद्दल डॉ. अंभुरे यांना विचारले असता, ज्यावेळी एखादी महिला ही गर्भवती असेल तर तिला दर्जेदार आहार मिळत नाही. तसेच घरातील गरिबी आणि रोजगाराच्या शोधात मुलांकडे होणारे दुर्लक्ष ही कारणे आहेत. तर काही मुलांमध्ये हा आजार अनुवंशिक असतो. तर काहींना अन्य आजारांमुळे वजन न वाढण्याची कारण असल्याचे डॉ. अंभुरे म्हणाले. देश आणि राज्य पातळीवर कुपोषण निर्मूलनासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.त्यांचाच एक भाग म्हणून जालन्यात हे केंद्र सुरू केले आहे. अशा प्रकारची केंदे्र ही राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्याचा मोठा लाभ कुपोषित बालकांसाठी होत असल्याचा दावा डॉ. अंभुरे यांनी केला. या केंद्रात पी.जे भालतिलक, लता पोफळे, एस.व्ही. ढिल्पे, पूजा अग्रवाल, पुष्पा नरोडे या डॉक्टरांना मोठी मदत करतात.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नSocialसामाजिक