शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कुपोषित मुलांचे प्रकरण; धोका निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:44 IST

स्व. शंकरलाल मुंदडा गतिमंद मुलांच्या वसतिगृहात कुपोषणाने २००८ मध्ये किसन या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संस्थेचे सचिव विरेंद्र धोका यांच्यासह वसतिगृहाचे अधीक्षक आणि मुख्य कार्यकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील स्व. शंकरलाल मुंदडा गतिमंद मुलांच्या वसतिगृहात कुपोषणाने २००८ मध्ये किसन या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संस्थेचे सचिव विरेंद्र धोका यांच्यासह वसतिगृहाचे अधीक्षक आणि मुख्य कार्यकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.जालना शहरातील स्व. शंकरलाल मुंदडा गतीमंद मुलांच्या वसतिगृहात १६ आॅक्टोबर २००८ रोजी किसन या मुलाचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. त्याला सोलापूर येथील सोजर अनाथ आश्रमातून १३ आॅगस्ट २००८ रोजी जालना येथील स्व. शंकरलाल मुंदडा गतिमंद मुलांच्या वसतिगृहात आणण्यात आले होते. किसनची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला प्रथम खाजगी आणि नंतर जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, किसनचा मृत्यू कुपोषणाने झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर केले. याप्रकरणी महिला व बालविकास विभागाचे तत्कालीन अधिकारी रामकृष्ण ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात संस्थेचे सचिव वीरेंद्र धोका यांच्यासह अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांविरूद्ध भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास अधिकारी ठाकरे यांनी तपास पूर्ण करून संबंधितांविरूद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणावर जिल्हा प्रथम सत्र न्यायाधीश श्रीमती एस. डी. सोनी यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. सुनावणीत वसतिगृहाचा केअर टेकर रावसाहेब राऊत, स्वच्छता कर्मचारी राजपाल लाहोट, अधिक्षिका विजया लाळे, प्रशिक्षक आशा बिल्ला यांची साक्ष नोंदविण्यात आली. यात किसनच्या कुपोषणास नेमके कोण जबाबदार आहे हे निष्पन्न होऊ शकले नाही. तसेच महिला बालविकास प्रकल्पाचे अधिकारी रामकृष्ण कुलकर्णी यांची साक्ष घेण्यात आली. यात २००८ मध्ये या वसतिगृहात ३० ते ३५ गतीमंद मुले होती. १३ आॅगस्ट २००८ रोजी सोलापूरच्या सोजर वसतिगृहातून किसनसह ४ मुले स्व. शंकरलाल मुंदडा गतिमंद मुलांच्या वसतिगृहात आणण्यात आली. १५ आॅक्टोबर २००८ रोजी किसनचा कुपोषणाने मृत्यू झाला. या घटनेनंतर चौकशी अधिकारी देशमुख आणि वरिष्ठ लिपिक गिते यांनी किसनच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी केली.उलट तपासणीत महिला व बालविकास प्रकल्पाचे अधिकारी रामकृष्ण कुलकर्णी म्हणाले की, किसन हा तेव्हा दोन दिवसांपासून आजारी होता. तो कुपोषणाने ग्रस्त असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले होते. पण जेव्हा स्व. शंकरलाल मुंदडा गतीमंद मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली. तेव्हा मुलांची योग्यरितीने देखभाल ठेवली जात असल्याचे व त्यांचे आरोग्यही सुस्थितीत असल्याचे आढळून आले. तसेच चांगल्या दर्जाचे अन्नही या वसतिगृहातील मुलांना देण्यात येत असल्याचे पाहणीत आढळून आल्याचे कुलकर्णी यांनी दिलेल्या साक्षीत सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयDeathमृत्यू