शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

शेतकरीविरोधी कायद्याबाबत काँग्रेसची मोहीम यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

जालना : केंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरावर शेतकरी मेळाव्यांचे ...

जालना : केंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरावर शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात कृषी कायद्यांची माहिती देऊन हे कायदे रद्द करावेत, यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून प्रदेश काँग्रेसने राज्यभर १० फेब्रुवारीपर्यंत तालुका ठिकाणी शेतकरी मेळावे घेतले जाणार आहेत. कृषी विरोधी कायदे व हे कायदे मागे घेण्यासाठी जन आंदोलन उभा करून केंद्र शासनाचा निषेध नोंदविला जाणार आहे. दिल्ली येथील आंदोलनात १५५ शेतकऱ्यांनी बलिदान दिले असून, त्यांना अभिवादन केले जाणार आहे. तालुकास्तरीय मेळाव्यानंतर २० फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा आणि पदयात्रा काढून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे. त्यामुळे तालुका, जिल्हा पातळीवरील शेतकरी मेळावे यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. कैलास गोरंट्याल, राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव आदींनी केले आहे.