शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

महायुतीच्या कार्यकर्त्यांना चिंता; अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमात; तरीही अबोला

By विजय मुंडे  | Updated: April 29, 2024 12:29 IST

२०१९ ची जालना लोकसभा निवडणूक गाजली ती रावसाहेब दानवे यांना खोतकर यांनी दिलेल्या आव्हानामुळे ! या निवडणुकीत खोतकर यांची मनधरणी करताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनव आले होते.

जालना : महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिंदेसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्यात ऐन लोकसभा निवडणुकीत गत काही दिवसांपासून वैचारिक मतभेद दिसत आहेत. याची प्रचिती रविवारी जालना शहरात आयोजित ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमात पुन्हा आली. एकाच कार्यक्रमात हजर असताना या दोन्ही नेत्यांत अबोला राहिल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

२०१९ ची जालना लोकसभा निवडणूक गाजली ती रावसाहेब दानवे यांना खोतकर यांनी दिलेल्या आव्हानामुळे ! या निवडणुकीत खोतकर यांची मनधरणी करताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनव आले होते. वरिष्ठांनी मध्यस्थी केल्याने खोतकर यांनी माघार घेतली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत खोतकर यांचा पराभव झाला आणि खोतकर-दानवे यांच्यातील वैचारिक मतभेद वाढले. याची प्रचिती वेळोवेळी आली.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर मित्रपक्षाचा मेळावा झाला आणि दानवे यांना पाच लाखांची लीड देण्याची घोषणा मित्रपक्षातील नेत्यांनी केली. त्यावेळी खोतकर यांनीही युती धर्म पाळत दानवे यांना लीड देऊ, असा दावा केला होता. दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही खोतकर यांनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली. परंतु, नंतरच्या कार्यक्रमात खोतकर यांनी दूर राहणे पसंत केले. भाजपकडून मान मिळत नसल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. खोतकर यांनीही योग्य ठिकाणी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले होते. त्यामुळे खोतकर हे नाराज असल्याची चर्चाही महायुतीच्या मित्रपक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. त्यात भर पडली ती खोतकर यांनी दानवे यांच्या अर्ज भरण्याच्या आणि प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला मारलेल्या दांडीमुळे ! खोतकर कधी प्रचारात उतरणार याची उत्सुकता मित्रपक्षातील पदाधिकारी विशेषतः भाजपच्या पदाधिकाऱ्यांना होती. त्यात खोतकर आणि दानवे हे रविवारी जालना येथे आयोजित ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमात हजर होते. परंतु, त्यांनी एकमेकांशी अबोला ठेवल्याने महायुतीच्या पदाधिकार- कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

शिवसैनिकही शांतउपनेते अर्जुन खोतकर हेच प्रचाराच्या मैदानात उतरलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकही प्रचारात दिसत नाहीत. लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे खोतकरांची नाराजी दूर होणार केव्हा आणि त्यासाठी पुढाकार घेणार कोण यावरही आता महायुती विशेषत: भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत चर्चा सुरू आहे.

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकर