शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

‘लोकमत’तर्फे ग्रामविकासातील शिलेदारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:58 IST

२० ते २५ शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटशेती करुन नवीन तंत्रज्ञान वापरले. तर यातून दर्जेदार उत्पन्न मिळेल, असे मत फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीत पाण्याची शास्वती राहिलेली नाही. यातून धोका निर्माण होत असल्याने शेतकरी कोणतेही तंत्रज्ञान खरेदी करण्यास हिंमत करीत नाही. पण, २० ते २५ शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटशेती करुन नवीन तंत्रज्ञान वापरले. तर यातून दर्जेदार उत्पन्न मिळेल, असे मत फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले.संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस’चे सोमवारी थाटात वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.दरम्यान कापसे यांनी लोकमतेच भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, सध्या जिकडे- तिकडे लोकमत दिसत आहे.हा आगळा- वेगळा कार्यक्रम लोकमत समूहाने आयोजित केल्याबद्दल लोकमत समूहाचे आभार. अगदी सरळ- साध्या व सोप्या भाषेत लोकमत बातमी देत असून विकासात्मक बातमीवर लोकमतचा अधिक भर असतो.शेतकऱ्यांनी धोका पत्करला पाहिजे. शेतकऱ्यांनी धोका पत्करल्यास चांगल्या उत्पन्नही निघू शकते. असेही त्यांनी सांगितले.भगवान कापसे : सरपंच अवॉर्ड कार्यक्रमात मार्गदर्शनआज परदेशात आपल्यापेक्षा चार पट अधिक उत्पन्न घेतले जाते. ब्राझील देशात हेक्टर ४० क्विंटल कापसाचे उत्पन्न घेतले जाते. आपल्याकडे ५० ते ६० क्विंटल उत्पन्न शेतकरी काढतात; परंतु सरासरी उत्पन्न घटते. मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करावे, सरपंचांनी गावातील शाळा, आरोग्य आदी गोष्टी सुधारण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.तसेच यावेळी कापसे यांनी जायकवाडीच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास शेतीतून जास्त उत्पन्न कशा प्रकारे मिळेल हेही समजावून सांगितले.सरपंचांनी संधीचे सोने करावे : मुकीम देशमुखजि. प. अतिरीक्त मुख्य कार्यकारी मुकीम देशमुख म्हणाले, ७३ व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामपंचायतीला मोठे अधिकार प्राप्त झाले आहेत. यामुळे सरपंचांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे, तसेच आज मोठ्या प्रमाणात महिला सरपंच आहेत. परंतु, त्यांच्या कुटूंबातील व्यक्ती कामकाज पाहत असतो. महिलांना मदत केल्यास त्या अधिक चांगले काम करू शकतात. यासाठी कुटूंबातील व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सन १९६२ मधील शाळा पहा आणि आताच्या शाळा पहा, दोन्हीमध्ये फरक दिसेल. गावामध्ये काम करताना कोणत्याही कामात सातत्य ठेवा, आपल्याकडे मोहिम सुरू आहे. तोपर्यंतच काम केले जाते. मोहिम बंद होताच काम बंद पडते. नविन कामांसोबत जुने काम सुरू ठेवण्यासाठी सरपंचांनी सातत्यपूर्ण काम करावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटLokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्