शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

‘लोकमत’तर्फे ग्रामविकासातील शिलेदारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:58 IST

२० ते २५ शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटशेती करुन नवीन तंत्रज्ञान वापरले. तर यातून दर्जेदार उत्पन्न मिळेल, असे मत फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीत पाण्याची शास्वती राहिलेली नाही. यातून धोका निर्माण होत असल्याने शेतकरी कोणतेही तंत्रज्ञान खरेदी करण्यास हिंमत करीत नाही. पण, २० ते २५ शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटशेती करुन नवीन तंत्रज्ञान वापरले. तर यातून दर्जेदार उत्पन्न मिळेल, असे मत फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले.संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस’चे सोमवारी थाटात वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.दरम्यान कापसे यांनी लोकमतेच भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, सध्या जिकडे- तिकडे लोकमत दिसत आहे.हा आगळा- वेगळा कार्यक्रम लोकमत समूहाने आयोजित केल्याबद्दल लोकमत समूहाचे आभार. अगदी सरळ- साध्या व सोप्या भाषेत लोकमत बातमी देत असून विकासात्मक बातमीवर लोकमतचा अधिक भर असतो.शेतकऱ्यांनी धोका पत्करला पाहिजे. शेतकऱ्यांनी धोका पत्करल्यास चांगल्या उत्पन्नही निघू शकते. असेही त्यांनी सांगितले.भगवान कापसे : सरपंच अवॉर्ड कार्यक्रमात मार्गदर्शनआज परदेशात आपल्यापेक्षा चार पट अधिक उत्पन्न घेतले जाते. ब्राझील देशात हेक्टर ४० क्विंटल कापसाचे उत्पन्न घेतले जाते. आपल्याकडे ५० ते ६० क्विंटल उत्पन्न शेतकरी काढतात; परंतु सरासरी उत्पन्न घटते. मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करावे, सरपंचांनी गावातील शाळा, आरोग्य आदी गोष्टी सुधारण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.तसेच यावेळी कापसे यांनी जायकवाडीच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास शेतीतून जास्त उत्पन्न कशा प्रकारे मिळेल हेही समजावून सांगितले.सरपंचांनी संधीचे सोने करावे : मुकीम देशमुखजि. प. अतिरीक्त मुख्य कार्यकारी मुकीम देशमुख म्हणाले, ७३ व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामपंचायतीला मोठे अधिकार प्राप्त झाले आहेत. यामुळे सरपंचांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे, तसेच आज मोठ्या प्रमाणात महिला सरपंच आहेत. परंतु, त्यांच्या कुटूंबातील व्यक्ती कामकाज पाहत असतो. महिलांना मदत केल्यास त्या अधिक चांगले काम करू शकतात. यासाठी कुटूंबातील व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सन १९६२ मधील शाळा पहा आणि आताच्या शाळा पहा, दोन्हीमध्ये फरक दिसेल. गावामध्ये काम करताना कोणत्याही कामात सातत्य ठेवा, आपल्याकडे मोहिम सुरू आहे. तोपर्यंतच काम केले जाते. मोहिम बंद होताच काम बंद पडते. नविन कामांसोबत जुने काम सुरू ठेवण्यासाठी सरपंचांनी सातत्यपूर्ण काम करावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटLokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्