शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

लॉकडाऊनमध्ये पती-पत्नींमध्ये कुरबुरी वाढल्या; स्वयंपाकासह घरकामावरून होतायत घराघरामध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 19:09 IST

कोरोनाच्या संकटातही पती-पत्नींमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचे पुढे आले आहे

ठळक मुद्देमोबाईलचा अतिवापर, अनैतिक संबंधही कालविताहेत संसारात विष

जालना : कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांची नोकरी गेली आणि प्रशासकीय सूचनांमुळे घरातही कैद राहावे लागले. मात्र, कोरोनाच्या संकटातही पती-पत्नींमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचा प्रकार महिला तक्रार निवारण कक्षात दाखल तक्रारींवरून समोर येत आहे. 

दारू, मोबाईलचा अतिवापर, संशयी वृत्ती, यामुळे अनेकांच्या संसारात वाद निर्माण होत असून, हे वाद पोलीस ठाणे, कोर्टापर्यंत जात आहेत. तक्रारींनुसार पोलीस प्रशासन समुपदेशनाचे काम करीत आहे.

तक्रारींची कारणे - मी शहरातील कंपनीत नोकरी केली. गावात नाही राहणार, शेतात काम नाही करणार. - सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा अट्टाहास. मुलांचे वाढलेले व्यसनांचे प्रमाण. - लग्नात राहिलेला हुंडा किंवा व्यवसायासाठी पैशांची सतत मागणी करणे. -  मूलबाळ न होणे, अनैतिक संबंध, अशा एक ना अनेक कारणांमुळे पती- पत्नींमधील वाद विकोपाला जात आहेत.

स्वभावातील बदल लक्षात घेणे गरजेचेकोरोनामुळे अनेकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. ज्यांची नाेकरी गेली किंवा व्यवसायात तोटा झाला अशांची मानसिक स्थितीही खालावलेली असते किंवा कुटुंबातील विविध कारणांमुळेही मानसिक तणाव येतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या स्वभावातील, मानसिकतेतील बदल तात्काळ लक्षात येणे गरजेचे आहे. मानसिक समुपदेशन आणि उपचार घेतले, तर भविष्यातील नुकसान टाळता येते. -डॉ. एम.डी. मुळे, मानसाेपचारतज्ज्ञ 

आजच्या युवा पिढीमध्ये वाढलेली व्यसनाधीनता ही पती- पत्नींमध्ये वाद होण्याचे मूळ कारण ठरत आहे. वाद टाळण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन निर्माण होणारे प्रश्न मार्गी लावावेत. -एस.बी.राठोड, महिला सुरक्षा कक्ष२५२एकूण तक्रारी दाखल१०८तक्रारींचे निराकरण

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना