शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ७ जानेवारीला होणार प्रसिद्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:49 IST

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ज्या कर्जदार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याशी संलग्न नाहीत, अशा शेतक-यांच्या नावांची यादी ७ जानेवारीपर्यंत प्रसिध्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ज्या कर्जदार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याशी संलग्न नाहीत, अशा शेतक-यांच्या नावांची यादी ७ जानेवारीपर्यंत प्रसिध्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत सर्वाधिक कर्जदार असलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांवर वेळेत यादी तयार करण्याची जबाबदारी वाढली आहे. आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतक-यांची यादी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिध्द केली जाणार आहे. विशेषत: कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अनिर्वाय आहे.महाविकास आघाडी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्जखाते, अल्पमुदत पीक कर्ज, अल्पमुदत कर्जाच्या पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेली थकबाकी. परतफेड न केलेले मुद्दल व व्याज मिळून २ लाख रूपयापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. या कर्जमाफी प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शेतक-यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करून घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.ज्या शेतक-यांचे कर्जखाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल अशा शेतक-यांच्या याद्या ७ जानेवारीपर्यंत बँका, ग्रामपंचायती, विकास संस्था, आपलं सरकार केंद्र, गावातील चावडीवर प्रसिध्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक लाभार्थी शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेतील आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँक प्रशासनाला निर्धारित वेळेत याद्या तयार कराव्या लागणार आहेत. प्रसिध्द होणा-या यादीतील नावाची, बँक खात्याची तपासणी करून शेतक-यांनी तात्काळ बँक शाखेशी संपर्क साधून कर्जखात्याशी आधार क्रमांक लिंक करून घेणे गरजेचे आहे. कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळणारकर्जमाफीतील लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर आपले सरकार केंद्रात जाऊन लाभार्थी शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण करताना आपल्याला मिळालेल्या कर्जमाफीची रक्कम मान्य नसेल तर तक्रार नोंदविता येणार आहे. ही तक्रार आॅनलाईन पध्दतीने जिल्हास्तरीय समितीकडे येणार आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व इतर सदस्य संबंधित शेतक-यांच्या कर्जाची माहिती घेऊन त्या तक्रारीनुसार शेतक-यांचे समाधान करणार आहेत.कर्जमाफीच्या याद्या ज्या- ज्या वेळी प्रसिध्द होतील त्या- त्या वेळी शेतक-यांनी याद्यांची पाहणी करणे गरजेचे आहे. आधार प्रमाणिकरण केल्यानंतर संबंधित शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे जमिनीवर असलेला कर्जाचा बोजा कमी करता येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षासाठी जिल्ह्यातील संबंधित लाभार्थी शेतकरी पीककर्ज घेण्यास पात्र राहणार आहेत.जिल्ह्यात दोन लाखावर लाभार्थी शेतकरीया कर्जमाफी प्रक्रियेत कर्ज खात्याशी आधार लिंक नसलेल्या शेतक-यांची माहिती संकलित केली जात आहे. या योजनेत जिल्ह्यातील साधारणत: दोन लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत. संबंधितांचे अंदाजे १३०० कोटी रूपये कर्ज माफ होणार आहे. यात जिल्हा बँकेच्या ५३ हजार शेतक-यांचा समावेश असून, त्यांचे साधारणत: १३० कोटी रूपयांचे कर्ज माफ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी