शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धोकादायक इमारतींकडे पाठ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:41 IST

शहरात जवळपास ३४७ धोकादायक इमारती आहेत. आतापर्यत या इमारतीच्या दुर्घटनेत पाच वर्षांत भिंत पडून चार जणांचे बळी गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात जवळपास ३४७ धोकादायक इमारती आहेत. आतापर्यत या इमारतीच्या दुर्घटनेत पाच वर्षांत भिंत पडून चार जणांचे बळी गेले आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाने वेळीच धोकादायक इमारतीकडे लक्ष दिले असते तर कदाचित दुर्घटना टाळता आल्या असत्या असे नागरिकांचे म्हणणे आहे.जालना शहर प्राचीन शहर म्हणून ओळखले जाते. जुना जालना आणि नवीन जालना असे शहराचे दोन भाग पडले आहेत. दक्षिणेला जुना जालना तर उत्तरेला नवीन जालना वसले आहे.जुन्या जमान्यातील धान्यांची बाजारपेठ म्हणून सुध्दा शहराची ओळख आहे. मराठवाड्यासह विदर्भातील बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा परिसरातील अनेकजण शहरात बाजारासाठी येत असल्याचे जुने लोक सांगतात. त्या काळात अनेक जुन्या इमारती बांधण्यात आलेल्या होत्या कालांतराने त्या जिर्ण झाल्याने हा मुद्दा पुन्हा एैरणीवर आला आहे.धोकादायक इमारतींचे पुढे काय?शहरातील जुना जालना आणि नवीन जालना येथे जुनी इमारत कोसळून झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेत चार जणांचा बळी गेला शहरात ३४७ इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्या कधीही कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच शहरातील जुन्या वेशींची सुध्दा दुरवस्था झाली आहे. त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.तज्ज्ञ काय म्हणतात?जालना शहरात अनेक प्राचीन इमारती आहेत. यातील काही इमारती आजही चांगल्या अवस्थेत आहेत. परंतु ज्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांचे सर्व्हेक्षण होऊन तातडीने स्ट्रक्चरल आॅडिट जालना पालिकेने केले पाहिजे.- देवेंद्र खेरूडकरस्थापत्य अभियंता, जालनास्ट्रक्चरल आॅडिट करणारशहरातील जुना आणि नवीन जालना परिसरात असलेल्या ३० वर्ष तसेच त्यापेक्षा जून्या इमारतीचे नगरपालिका प्रशासनाकडून लवकरच स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित माहिती घेत आहोत, पावसाचे दिवस असल्याने धोकादायक इमारतीपासून नागरिकांनी सावध राहावे.- नितिन नार्वेकर, मुख्याधिकारी न.प.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटना